शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:13 IST

नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देबीडमध्ये समता मेळावा : छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरकारच्या विरोधात बोललं तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी हत्या केली जाते. मेक इन इंडियाचा बाऊ सरकारने केला आहे. दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली होती. मात्र, यातील एकही गोष्ट साध्य झाली नाही. परंतु नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.बीड येथे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, खा. समीर भुजबळ, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडीत, आ. रामराव वडकुते, बापूसाहेब भुजबळ, आयोजक सुभाष राऊत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, पार्वती सिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, बीडमध्ये आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पक्ष व पदाचा विचार न करता ते समतेच्या मागे उभे राहिले. ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावत लढलो. याच बीडमधून आपण समता पर्वाची सुरुवात पुन्हा एकदा करीत असल्याचे ते म्हणाले.जयदत्त क्षीरसागर : पवारांच्या सभेला हजर रहाभुजबळांच्या नवीन पर्वाचा शुभारंभ बीडपासून होत आहे. त्यांनी संघर्षातूनही आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. हा तुरुंगवास हा सहन करावा लागला ? ज्या महाराष्ट्र सदनावरुन भुजबळांना आत जावे लागले त्यामध्ये बसून अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठका घेतात. महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर असल्याच्या वलग्ना देखील त्यांच्याकडून केल्या जातात. मग भुजबळांना ही शिक्षा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असून, सामान्यांना आधार देण्यासाठी ज्योती-क्रांतीच्या विचाराकडे आपल्याला जावे लागेल असे ते म्हणाले. शरद पवार यांची १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये सभा होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.२०१९ नंतर पुन्हानिवडणूक होणार नाही- धनंजय मुंडेमेळाव्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा हे सरकार निवडून आले तर लोकशाहीला घातक आहे.पुढे निवडणुकाच घेतल्या जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे एकत्रित येऊन या जातीयवादी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.शेतकरी अडचणीतराज्यात शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील तीन हजार भरा, नसता रोहित्र बंद करु असे सांगितले जाते. या दुष्काळाच्या परिस्थितीत पैसे कोठून भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यात ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार होतो. शासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. पुढील काळात दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार आहे. परंतु सरकारकडून मात्र सर्वांच्याच आशेवर पाणी फेरण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली.कार्यकर्त्यांचा गोंधळमेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख नेते व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या एका गटाने जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडले. त्यानंतर क्षीरसागरांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत बसले.

टॅग्स :BeedबीडChagan Bhujbalछगन भुजबळ