शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:13 IST

नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देबीडमध्ये समता मेळावा : छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरकारच्या विरोधात बोललं तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी हत्या केली जाते. मेक इन इंडियाचा बाऊ सरकारने केला आहे. दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली होती. मात्र, यातील एकही गोष्ट साध्य झाली नाही. परंतु नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.बीड येथे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, खा. समीर भुजबळ, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडीत, आ. रामराव वडकुते, बापूसाहेब भुजबळ, आयोजक सुभाष राऊत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, पार्वती सिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, बीडमध्ये आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पक्ष व पदाचा विचार न करता ते समतेच्या मागे उभे राहिले. ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावत लढलो. याच बीडमधून आपण समता पर्वाची सुरुवात पुन्हा एकदा करीत असल्याचे ते म्हणाले.जयदत्त क्षीरसागर : पवारांच्या सभेला हजर रहाभुजबळांच्या नवीन पर्वाचा शुभारंभ बीडपासून होत आहे. त्यांनी संघर्षातूनही आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. हा तुरुंगवास हा सहन करावा लागला ? ज्या महाराष्ट्र सदनावरुन भुजबळांना आत जावे लागले त्यामध्ये बसून अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठका घेतात. महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर असल्याच्या वलग्ना देखील त्यांच्याकडून केल्या जातात. मग भुजबळांना ही शिक्षा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असून, सामान्यांना आधार देण्यासाठी ज्योती-क्रांतीच्या विचाराकडे आपल्याला जावे लागेल असे ते म्हणाले. शरद पवार यांची १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये सभा होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.२०१९ नंतर पुन्हानिवडणूक होणार नाही- धनंजय मुंडेमेळाव्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा हे सरकार निवडून आले तर लोकशाहीला घातक आहे.पुढे निवडणुकाच घेतल्या जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे एकत्रित येऊन या जातीयवादी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.शेतकरी अडचणीतराज्यात शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील तीन हजार भरा, नसता रोहित्र बंद करु असे सांगितले जाते. या दुष्काळाच्या परिस्थितीत पैसे कोठून भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यात ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार होतो. शासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. पुढील काळात दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार आहे. परंतु सरकारकडून मात्र सर्वांच्याच आशेवर पाणी फेरण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली.कार्यकर्त्यांचा गोंधळमेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख नेते व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या एका गटाने जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडले. त्यानंतर क्षीरसागरांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत बसले.

टॅग्स :BeedबीडChagan Bhujbalछगन भुजबळ