शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

छावण्यांमध्ये जनावरांची महिनाभरात संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:17 IST

आजघडीला ५९९ छावण्या कार्यरत आहेत. एका महिन्यात छावण्यांवरील जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. आजघडीला ५९९ छावण्या कार्यरत आहेत. एका महिन्यात छावण्यांवरील जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे. यापैकी अनेक छावण्यांवर नियमांचे पालन केले जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ३५१ पेक्षा अधिक चारा छावण्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु हे पथक नुसते नावालाच असल्याने अहवाल तयार असून देखील एकाही छावणीवर कारवाई करण्यात आलेली नाही.५९९ पैकी बीड तालुक्यात १८७ व आष्टी तालुक्यात १८५ चारा छावण्या आहेत. त्यानंतर क्रमश: शिरुर, पाटोदा, केज, गेवराई, अंबाजोगाई येथे छावण्या आहेत. या छावण्यांवरील जनावरांच्या संख्येत ३०० ते ८०० चा फरक दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील पशुधन व छावण्यांवरील जनावरांची संख्या यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. जनावरांची योग्य तपासणी करणे व जास्त जनावरे असतील तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शासनाला २० ते ३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.चारा मिळतो, पण पेंड नाही...

.दोन्ही हंगामातील पेरा हा कमी झालेला असल्यामुळे चारा शिल्लक नाही. त्यामुळे चारा छावणी ही शेतकऱ्यांना आधार वाटत आहे. अनेक छावण्यांवर चारा दिला जातो. मात्र, पेंड मिळत नाही असे शेतकरी सांगतात. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शेतक-यांची सर्व व्यवस्था करणे छावणी चालकांना बंधनकारक आहे. त्यामुळे योग्य व्यवस्था होत नसले तर शेतक-यांनी देखील जागरुक राहून तक्रार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी