शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

छावण्यांमध्ये जनावरांची महिनाभरात संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:17 IST

आजघडीला ५९९ छावण्या कार्यरत आहेत. एका महिन्यात छावण्यांवरील जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. आजघडीला ५९९ छावण्या कार्यरत आहेत. एका महिन्यात छावण्यांवरील जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे. यापैकी अनेक छावण्यांवर नियमांचे पालन केले जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ३५१ पेक्षा अधिक चारा छावण्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु हे पथक नुसते नावालाच असल्याने अहवाल तयार असून देखील एकाही छावणीवर कारवाई करण्यात आलेली नाही.५९९ पैकी बीड तालुक्यात १८७ व आष्टी तालुक्यात १८५ चारा छावण्या आहेत. त्यानंतर क्रमश: शिरुर, पाटोदा, केज, गेवराई, अंबाजोगाई येथे छावण्या आहेत. या छावण्यांवरील जनावरांच्या संख्येत ३०० ते ८०० चा फरक दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील पशुधन व छावण्यांवरील जनावरांची संख्या यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. जनावरांची योग्य तपासणी करणे व जास्त जनावरे असतील तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास शासनाला २० ते ३० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.चारा मिळतो, पण पेंड नाही...

.दोन्ही हंगामातील पेरा हा कमी झालेला असल्यामुळे चारा शिल्लक नाही. त्यामुळे चारा छावणी ही शेतकऱ्यांना आधार वाटत आहे. अनेक छावण्यांवर चारा दिला जातो. मात्र, पेंड मिळत नाही असे शेतकरी सांगतात. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार शेतक-यांची सर्व व्यवस्था करणे छावणी चालकांना बंधनकारक आहे. त्यामुळे योग्य व्यवस्था होत नसले तर शेतक-यांनी देखील जागरुक राहून तक्रार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरी