शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही; १३ वर्ष संघर्ष करीत फोडला कर्जाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:52 IST

तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकाळेगावचे शेतकरी बद्रीनारायण मोटारकरला झाले आकाश मोकळे

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तेरा वर्ष संघर्ष करून कर्जाचा डोंगर फोडत बीड तालुक्यातील काळेगाव येथील बद्रीनारायण रामभाऊ मोटारकर हे कर्जमुक्त झाले. संपूर्ण कर्ज माफ केल्याचे बँकेने त्यांना नुकतेच पत्र दिल्याने तेरा वर्षाच्या संकटातून बाहेर पडलो हा सर्वात मोठा आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.कुठलेच व्यसन नसलेले चौथी पास बद्रीनारायण मोटारकर यांच्याकडे तीन एकर जमीन. २००६ मध्ये त्यांनी एसबीआयकडून २ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज मोसंबी फळबागेसाठी घेतले होते. तसेच ६५ हजार रु पयांचे पीक कर्ज घेतले होते. मार्च २००७ ते फेब्रुवारी २००८ च्या दरम्यान केंद्र सरकारने पाच एकरच्या आतील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले होते. पण मोटारकर यांचे कर्ज माफ झाले नव्हते. तसेच दुष्काळात मोसंबीची संपूर्ण फळबाग उद्ध्वस्त झाली. तीन मुलांचे शिक्षण, घरचा प्रपंच याची चिंता होती. तरीही ते खचले नाहीत, वेळोवेळी न्याय मागत होते. घरच्या बिकट परिस्थितीत मुलीच्या शिक्षणाला विराम द्यावा लागणार होता. मात्र, डॉक्टर होण्याची तिची जिद्द होती. बीड येथील प्रा. अर्जुन भोसले, प्रा. राम, प्रा. बाबुराव नप्ते यांनी मोटारकार यांच्या मुलीला तीन वर्ष मोफत शिकवले. योगायोगाने तिला एम. बी. बी. एस. साठी प्रवेशही मिळाला.एकीकडे समाजाचे बळ मिळत असताना दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली. बँकेचे १० लाख आणि सावकाराचे ४ लाख मिळून १४ लाख रु पयांच्या कर्जाचा डोंगर झाल्याने बद्रीनारायण मोटारकार घाबरु न गेले होते. मात्र ते लढत राहिले.‘लोकमत’ने त्यांची व्यथा वेळोवेळी मांडली. शेतीतील कसेबसे मिळणाऱ्या उत्पन्नातून फेड करत सावकारी पाश फेकून दिला. बॅँकेच्या कर्जमाफीसाठी जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालय आणि लोकप्रतिनिधींकडे सतत नऊ वर्ष चकरा मारल्या. कर्जाचा डोंगर चढलेला असतानाही त्यांनी जिद्द हरली नाही, जमीन विकली नाही. तेरा वर्षांचा संघर्ष संपला, माझ्यासाठी आकाश मोकळे झाले आहे. आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे मोटारकार म्हणाले.‘लोकमत’चा आधार मोलाचा२०१६ मध्ये आपल्या नावावर उचललेल्या बोगस कर्जाबाबत मोटारकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे सोशल मिडीयाद्वारे न्याय मागितला. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोन करत नेहमी धीर दिला. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनीही लक्ष घातले. मुंबईचे कैलास जेबले, एसबीआयचे अधिकारी या सर्वांमुळे कर्जाचा फेरा सुटल्याचे सांगताना लोकमतचा आधार मोलाचा ठरल्याचे मोटारकार म्हणाले.मकरंदमुळे दात्यांचा आधारकाळेगावच्या ग्रामस्थांनी वर्गणी जमा करुन गावच्या लेकीच्या (मोटारकर यांची मुलगी) वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सांगण्यावरुन मुंबई येथील मिलिंद पर्वते, डॉ. रानडे यांनीही मानिसक आणि आर्थिक आधार देण्याचे काम वेळोवेळी केल्यामुळे मुलीचे कोल्हापूर येथे एमबीबीएस दुसºया वर्षात शिक्षण सध्या सुरू आहे.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी