शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सोयाबीनच्या भाववाढीचा नाममात्र शेतकऱ्यांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी ...

अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी सोयाबीनची स्थिती झाली आहे. सोयाबीनच्या या विक्रमी भावाचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचा उताराही मोठ्या प्रमाणात निघाला. शेतकऱ्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीतच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली. यावेळी सोयाबीनला ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता तो भाव ६८००च्या पुढे गेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सामान्यपणे खरीप व रद्दी अशी हंगामातील दोन पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकेचे घेतलेले कर्ज अथवा सावकाराचे कर्ज किंवा उसनवारीवर आणलेले पैसे फेडण्याची घाई असते. त्यामुळे शेतात उत्पादन झालेला माल तात्काळ बाजारपेठेकडे आणण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्यावेळी जो भाव मिळेल तो पदरात पाडून घ्यायचा अशी सवयच शेतकऱ्यांना लागली आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडतीवर माल आणून टाकला तर तिथे किती दिवस ठेवायचा, ठेवलेल्या मालाची सुरक्षितता काय, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतात. भाववाढीसाठी सोयाबीन ठेवायचे तर अंबाजोगाईत मोठे वेअर हाउसही उपलब्ध नाही. त्या वेअरहाउसमध्ये माल ठेवण्यासाठी लागणारे भाडे, वाहतुकीचा खर्च, याबाबी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे आहे त्या किमतीत सोयाबीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर आता पाच ते सहा महिन्यांनी सोयाबीनचे भाव अचानकच मोठ्या प्रमाणात वाढले. आता बाजारात कमी झालेली आवक त्यामुळे शेतकऱ्यांना या भाववाढीचा म्हणावा तसा लाभ मिळणार नाही. मात्र, ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून ठेवलेली आहे, त्यांना याचा होणार असल्याचे समोर आले आहे.