शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

सोयाबीनच्या भाववाढीचा नाममात्र शेतकऱ्यांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST

अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी ...

अंबाजोगाई : तालुक्यात यंदा सोयाबीनच्या भावाने प्रतिक्विंटल सहा हजारांचा आकडा ओलांडला आहे. आवक कमी व भाव जास्त अशी सोयाबीनची स्थिती झाली आहे. सोयाबीनच्या या विक्रमी भावाचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनचा उताराही मोठ्या प्रमाणात निघाला. शेतकऱ्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीतच मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली. यावेळी सोयाबीनला ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, आता तो भाव ६८००च्या पुढे गेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सामान्यपणे खरीप व रद्दी अशी हंगामातील दोन पिके घेतली जातात. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकेचे घेतलेले कर्ज अथवा सावकाराचे कर्ज किंवा उसनवारीवर आणलेले पैसे फेडण्याची घाई असते. त्यामुळे शेतात उत्पादन झालेला माल तात्काळ बाजारपेठेकडे आणण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. त्यावेळी जो भाव मिळेल तो पदरात पाडून घ्यायचा अशी सवयच शेतकऱ्यांना लागली आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडतीवर माल आणून टाकला तर तिथे किती दिवस ठेवायचा, ठेवलेल्या मालाची सुरक्षितता काय, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतात. भाववाढीसाठी सोयाबीन ठेवायचे तर अंबाजोगाईत मोठे वेअर हाउसही उपलब्ध नाही. त्या वेअरहाउसमध्ये माल ठेवण्यासाठी लागणारे भाडे, वाहतुकीचा खर्च, याबाबी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे आहे त्या किमतीत सोयाबीन विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर आता पाच ते सहा महिन्यांनी सोयाबीनचे भाव अचानकच मोठ्या प्रमाणात वाढले. आता बाजारात कमी झालेली आवक त्यामुळे शेतकऱ्यांना या भाववाढीचा म्हणावा तसा लाभ मिळणार नाही. मात्र, ज्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून ठेवलेली आहे, त्यांना याचा होणार असल्याचे समोर आले आहे.