शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मराठा आरक्षण काळाची गरज, केंद्र सरकारने मध्यस्थी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:36 AM

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील ...

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसइबीसी) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरुणाईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रामाणिक 'नायक' कोण? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण? सांगेल आणि देईल? असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत असल्याचे ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

३०-३५ वर्षापासून आपण संघर्ष करून हे मराठा आरक्षण मिळवलेले होते, ते आरक्षण राज्य सरकारला साधे टिकवता सुध्दा आले नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही. अशोक चव्हाण यांनी या निकालाच्या अनुषंगाने तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया आ.विनायक मेटे यांनी दिली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने मध्यस्थी करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आपली ठाम भूमिका आहे. आज जरी हे आरक्षण रद्द केले असले तरी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा त्रुटी दूर करून याचिका दाखल करता येईल का? या बाबत पुनर्विचार व्हावा,

राज्य सरकारने या बाबतीत पुढाकार घ्यावा, असे मत आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.

संपूर्णपणे समाजाची बाजू व सत्य परिस्थिती मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याने आरक्षण रद्दचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आणखी पिढ्यान‌् पिढ्या समाजाच्या बरबाद होतील, हे सत्य नाकारुन चालणार नाही, असे आ. सुरेश धस म्हणाले. तर मराठा आरक्षणप्रश्नी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विलोकन करता येईल का? याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करावा, असे माजी आ. भीमसेन धोंडे म्हणाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे एकत्र सरकार असूनदेखील ही दुर्दैवी वेळ फक्त राज्यकर्त्यांमुळेच आली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिले म्हणणारे फडणवीस तोंडघशी पडले. ३७० प्रमाणेच घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकारने द्यावे, या मागणीसाठी निर्णायक लढा उभा करावा लागेल, असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे म्हणाले.