शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

बीड जिल्ह्यात पावणेपाच कोटींची हवी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:20 AM

फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली. यात शेतकºयांच्या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आल्यानंतर जिल्हा पातळीवरील यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले. नुकताच शासनाकडे अंतीम अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार गेवराई, शिरुरकासार, माजलगाव आणि केज तालुक्यात नुकसान झाले आहे.गेवराई तालुक्यात ६००८ शेतकºयांच्या ३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या तालुक्यात जिरायतीचे २६६५.८ हेक्टर, बागायतीचे १०१६ हेक्टर तर १७२.४५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले.

शिरुर कासार तालुक्यात ७५७ शेतकºयांच्या ३९९.६९ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला आहे. यात जिरायती क्षेत्र २३०.६५, बागायती १५५.०४ तर १४ हेक्टरातील फळपिकांचा समावेश आहे.माजलगाव तालुक्यात ११३ शेतकºयांचे ८८.९९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. यात ७१.५३ हे. क्षेत्र जिरायतीचे, ५.४ हेक्टर क्षेत्र बागायतीचे तर १२.०६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचा समावेश आहे.केज तालुक्यात १४५ शेतकºयांचे ६० हेक्टर आर. क्षेत्रात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकरी फळपिके घेणारे आहेत. या तालुक्यात जिरायती वा बागायती पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल आहे. हा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासन मदत कधी मिळेल याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील नुकसानजिरायती क्षेत्र २९६८ हेक्टरबागायती क्षेत्र ११७६.४ हेक्टरफळपिके २५८.५१ हेक्टरएकूण ४४०२.९ हेक्टर

तालुकानिहाय अपेक्षित निधीगेवराई ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ५४०शिरुर ३९ लाख १३ हजार ४६०माजलगाव ७७ लाख ६ हजार ३८४केज १० लाख ८० हजारबोंडअळीच्या भरपाईसाठी लागणार ७७ कोटी रुपयेबीड जिल्ह्यात गुलाबी सेंद्रीय बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. नागपूर अधिवेशनात कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार पंचनाम्याचे सोपस्कर पार पडले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार हेक्टर आर. क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले आहे. यात जवळपास २ लाख ५७ हजार शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना मदतीसाठी सुमारे ७७ कोटी ५० हजार रुपयांचा निधी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.