शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:30 IST

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार

बीड : शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नूतन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मागील दीड महिन्यांपासून मुंबईत तळ ठोकून होते, अशी टीका मंत्री क्षीरसागर याचे पुतणे तथा जिल्हापरिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली. 

बीड शहरात मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील नगरपालिकेच्या नियोजना अभावी पाणी पुरवठा विस्कळीत आहे. शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, मा.आ. सुनील धांडे, बबन गवते, हेमा पिंपळे, बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक, महिला डोक्यावर हंडा घेऊन नागरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला तरी देखील पाणी पुरेल मात्र, नगरपालिकेचे नियोजन ढिसाळ असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर आक्रमक होणार असून, प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस