शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:30 IST

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार

बीड : शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नूतन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मागील दीड महिन्यांपासून मुंबईत तळ ठोकून होते, अशी टीका मंत्री क्षीरसागर याचे पुतणे तथा जिल्हापरिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली. 

बीड शहरात मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील नगरपालिकेच्या नियोजना अभावी पाणी पुरवठा विस्कळीत आहे. शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, मा.आ. सुनील धांडे, बबन गवते, हेमा पिंपळे, बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक, महिला डोक्यावर हंडा घेऊन नागरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला तरी देखील पाणी पुरेल मात्र, नगरपालिकेचे नियोजन ढिसाळ असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर आक्रमक होणार असून, प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस