शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बीडमध्ये राष्ट्रवादीचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; मंत्री क्षीरसागर यांच्यावर पुतण्याचे शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:30 IST

शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यास क्षीरसागर बंधूना ठरवले जबाबदार

बीड : शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नूतन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर शरसंधान केले आहे. शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त असताना जयदत्त क्षीरसागर मात्र मागील दीड महिन्यांपासून मुंबईत तळ ठोकून होते, अशी टीका मंत्री क्षीरसागर याचे पुतणे तथा जिल्हापरिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली. 

बीड शहरात मागील अनेक दिवसांपासून पाणी टंचाई आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील नगरपालिकेच्या नियोजना अभावी पाणी पुरवठा विस्कळीत आहे. शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, मा.आ. सुनील धांडे, बबन गवते, हेमा पिंपळे, बीड नगरपालिकेतील काकू-नाना आघाडीचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक, महिला डोक्यावर हंडा घेऊन नागरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला तरी देखील पाणी पुरेल मात्र, नगरपालिकेचे नियोजन ढिसाळ असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच पुढील काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी विविध प्रश्नांवर आक्रमक होणार असून, प्रश्न सुटले नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला. यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागण्यांचे निवेदन दिले. 

टॅग्स :WaterपाणीBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस