शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:01 AM

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात आंदोलन : ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करा’

बीड : केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. मात्र, ते अन्यायकारक आहे, व संविधान विरोधी आहे. त्यामुळे देशामध्ये फाळणी होऊ शकते. त्यामुळे हे विधेयक धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे, घटनाविरोधी आहे. त्यामुळे ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलन करून मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलक डोक्यास व दंडावर काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. यावेळी ‘सीएबी नाही शिक्षण, रोजगार पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.१३ डिसेंबर रोजी दुपारच्या नमाजनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सीएबी-एनसीआर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र शासनाने आणले आहे. ते दोन्ही सभागृहात पास झालेले आहे. यामध्ये देशातील जवळपास सर्व जाती धर्मांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र, मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून देशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांधून व्यक्त केली जात आहे. असे विधेयक आणून केंद्र सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करत आहे. तर या कायद्यामुळे संविधानाची पायमल्ली केली जात आहे. या कायद्यास देशभरात विरोध करण्यात येत आहे. याचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले. सीएबीच्या विरोधात काल बीड सह धारूर, केज, माजलगावसह अन्य काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले.शांततेत व शिस्तीत आंदोलनबीड येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हातात ‘सीएबी नाही रोजगार, शिक्षण, संरक्षण, अपराध मुक्त देश पाहिजे’ असे लिहिलेले घोषणाफलक होते. यावेळी शांततेत व शिस्तीत आंदोलन पार पडले.संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुफ्ती जावेद कासमी, मुफ्ती अब्दुल कासमी, सौलाना सय्यद साबीर, मौलाना जाकीर, मुफ्ती मोहीयोद्दीन, मौलाना इलियास कासमी, काझी जफर, अ‍ॅड शफीक , प्र.इलियास इनामदार, सौलाना अब्दुल रहीम, अब्दुल सलाम सेठ, महमद खामोद्दीन, माजी आ. सय्यद सलीम, न.प.उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी आ. सुनिल धांडे, संजय मालाणी, भागवत तावरे, अशोक हिंगे आदींनी मार्गदर्शन करून भारताच्या एकतेच्या व अखंडतेवर कोणालाही गंडातर आणू देणार नाही. आम्ही सर्व जण एकत्र येऊ असा नारा यावेळी दिला.

टॅग्स :BeedबीडMuslimमुस्लीमMorchaमोर्चाagitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक