शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

बीड जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. ...

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होते. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० शेततळ््यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. जिल्ह्यामध्ये ६ हजार ७३१ शेतक-यांनी मागले त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकºयांसाठी पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे खरीप, रबी या दोन्ही हंगामांतील पारंपरिक पिकांसह शेतकरी फळ लागवड व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे वळेल असे मत कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या झालेल्या कामांमुळे दुष्कळी परिस्थिवर मात करण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे.पुढील उद्दिष्ट वाढवण्याची मागणीमागेल त्याला शेततळे या योजनेमुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहे. शासनाने या योजनेतील उद्दिष्ट वाढवून द्यावे जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणीमागेल त्याला शेततळे योजनेमुळे मोठा फायदा झाला असून, पावसाळ्यात शेततळे भरल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे. पाण्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच पुढील काळात फळबाग लागवड करण्याचा मानस आहे.- युवराज विलासराव जगताप, शेतकरी

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीWaterपाणीMarathwadaमराठवाडा