शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

बीड जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. ...

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होते. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० शेततळ््यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. जिल्ह्यामध्ये ६ हजार ७३१ शेतक-यांनी मागले त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकºयांसाठी पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे खरीप, रबी या दोन्ही हंगामांतील पारंपरिक पिकांसह शेतकरी फळ लागवड व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे वळेल असे मत कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या झालेल्या कामांमुळे दुष्कळी परिस्थिवर मात करण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे.पुढील उद्दिष्ट वाढवण्याची मागणीमागेल त्याला शेततळे या योजनेमुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहे. शासनाने या योजनेतील उद्दिष्ट वाढवून द्यावे जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणीमागेल त्याला शेततळे योजनेमुळे मोठा फायदा झाला असून, पावसाळ्यात शेततळे भरल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे. पाण्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच पुढील काळात फळबाग लागवड करण्याचा मानस आहे.- युवराज विलासराव जगताप, शेतकरी

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीWaterपाणीMarathwadaमराठवाडा