शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बीड जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:10 IST

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. ...

बीड : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गतवर्षी ६ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच ६ हजार ७३१ शेततळे तयार करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे हा एकमेव पर्याय होता. त्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होते. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यासाठी ६ हजार ५०० शेततळ््यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी जवळपास १३ हजार शेतकरी पात्र ठरले होते. जिल्ह्यामध्ये ६ हजार ७३१ शेतक-यांनी मागले त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक शेततळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकºयांसाठी पाण्याचा एक मोठा स्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे खरीप, रबी या दोन्ही हंगामांतील पारंपरिक पिकांसह शेतकरी फळ लागवड व इतर शेतीपूरक व्यवसायांकडे वळेल असे मत कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या झालेल्या कामांमुळे दुष्कळी परिस्थिवर मात करण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतक-यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे.पुढील उद्दिष्ट वाढवण्याची मागणीमागेल त्याला शेततळे या योजनेमुळे शेतकरी सुजलाम् सुफलाम् होत आहे. शासनाने या योजनेतील उद्दिष्ट वाढवून द्यावे जेणेकरून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांना याचा लाभ घेता येईल, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणीमागेल त्याला शेततळे योजनेमुळे मोठा फायदा झाला असून, पावसाळ्यात शेततळे भरल्यानंतर संपूर्ण उन्हाळ्याच्या दिवसात देखील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे. पाण्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे चांगले पैसे मिळू लागले आहेत. तसेच पुढील काळात फळबाग लागवड करण्याचा मानस आहे.- युवराज विलासराव जगताप, शेतकरी

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीWaterपाणीMarathwadaमराठवाडा