शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांची थट्टा! कांद्याला २ रुपये किलो भाव,१७ गोण्या विकल्या अन् हाती पडला रुपया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 10:05 IST

कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

-  नितीन कांबळे कडा ( बीड) - बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक होत असली तरी बाजारभाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भाव नाही पण साठवणूक देखील परवड नाही.  सडून जाण्यापेक्षा दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरीकांदा विकत आहेत. मात्र,  हजारो रूपये खर्च आणि प्रचंड मेहनत करूनही कांद्याने वांदा केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. १७ गोण्या कांदा विकून  केवळ एक रूपया हातात आल्याचे आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे.

आष्टी तालुक्यातील बावी येथील नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी मोठ्या कष्टाने कांदा पीक घेतलं. काढणी झाल्यानंतर दोन पैसे मिळतील म्हणून विक्रीसाठी लटपटे अहमदनगर येथील बाजारपेठेत घेऊन गेले. एकूण १७ गोण्याचे ८४४ किलो वजन भरले. दोन रूपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. एकूण पट्टी १६८८ रूपये, यातुन १४६१ रूपये भाडे खर्च गेला,२२१ रूपये उचल गेली ,इतर खर्च ५ रूपये हे सगळे वजा होता हातात केवळ एक रूपया पडला. हजारो रूपये खर्च करून कांदा लागवड, मेहनत ,खत, औषध एवढा खर्च होऊन जर शेतकऱ्यांच्या मालाला सरकार भाव देत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे. खर्च हजारात आणि एक रूपया हातात ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

शेतकऱ्यांची थट्टा थांबवातीन महिन्यापुर्वी २० गुठ्ठे क्षेत्रात  कांदा लावला. ३० हजार खर्च झाला. अवघा दोन रूपये किलोचा भाव मिळाला अन् हातात एक रूपया आला. मायबाप सरकारने योग्य बाजारभाव द्यावा व होणारी थट्टा थांबवावी नाहीतर आम्हा शेतकर्‍यांपुढे टोकाचे पाऊस उचलण्या शिवायपर्याय नसल्याची भावना शेतकरी नामदेव लटपटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाBeedबीड