शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील दोन गावांना भेटी देऊन केंद्रीय पथकाच्या दुष्काळ दौऱ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:16 IST

 चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्दे केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून दोन गावे वगळली जरुड येथे संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

- सतीश जोशी

बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा हा धावता दौरा जिल्ह्यात चर्चेचा ठरला. केंद्र शासनाच्या पथकाने ६ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात पाथरी, सोनपेठमार्गे दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रवेश केला.

हे पथक माजलगावमार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील कांबी या गावांची पाहणी करणार होते. परंतु, ऐनवेळी या गावांना वगळले. हे पथक मानवत, पाथरीहून पोहनेर, सिरसाळामार्गे रेवली (ता. परळी) येथे जाणार होते. यासाठी बीड जिल्हा पोलीस पथकाची जीप पोहनेरजवळील बीड जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे गोदावरी पुलावर उभी होती. परंतु, या पथकाने ऐनवेळी मार्ग बदलला. विटा, सोनपेठमार्गे हे पथक रेवली येथे गेले. पथकाला गाठण्यासाठी पीएसआय योगेश खटके यांच्या गाडीला धावपळ करावी लागली. रेवलीहून माजलगावच्या विश्रामगृहावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. परंतु, त्यांनी माजलगाव रद्द करून परळीच्या विश्रामगृहावर भोजन घेतले.

परळी तालुक्यातील रेवली येथील सरपंच मनोहर केदार यांच्या शेतास भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर परळी विश्रमागृहावर जेवण करून सिरसाळा, वडवणी मार्गे  रस्त्यावरीलच बीड तालुक्यातील जरूड गावातील केशव काकडे यांच्या शेतास भेट देऊन इथेही जमलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जरूडला येईपर्यंत सूर्यास्त झाला होता. संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकात कोण ?दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकात केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी. शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा समावेश होता.  तसेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,  उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, कृषी अधीक्षक एम.एल. चपळेंसह महसूल, कृषी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. 

वैद्यनाथांचे दर्शनया पथकाचा बदललेला दौरा सोबत असणाऱ्या अनेकांना माहीत नव्हता. रेवलीहून हे पथक परळीत आले. वैद्यनाथांच्या दर्शनासाठी या पथकासोबत आलेला अधिकाऱ्यांचा ताफा पाहून मंदिरात भाविकांत कुतूहल निर्माण झाले. या सर्व अधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन परळीचे विश्रामगृह  गाठले. 

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार