शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील दोन गावांना भेटी देऊन केंद्रीय पथकाच्या दुष्काळ दौऱ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:16 IST

 चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्दे केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून दोन गावे वगळली जरुड येथे संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

- सतीश जोशी

बीड : बीड जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी आपल्या दौऱ्यात बदल करून चारपैकी दोनच गावांच्या शिवारास भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यांचा हा धावता दौरा जिल्ह्यात चर्चेचा ठरला. केंद्र शासनाच्या पथकाने ६ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात पाथरी, सोनपेठमार्गे दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रवेश केला.

हे पथक माजलगावमार्गे वडवणी तालुक्यातील खडकी, बीड तालुक्यातील कांबी या गावांची पाहणी करणार होते. परंतु, ऐनवेळी या गावांना वगळले. हे पथक मानवत, पाथरीहून पोहनेर, सिरसाळामार्गे रेवली (ता. परळी) येथे जाणार होते. यासाठी बीड जिल्हा पोलीस पथकाची जीप पोहनेरजवळील बीड जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे गोदावरी पुलावर उभी होती. परंतु, या पथकाने ऐनवेळी मार्ग बदलला. विटा, सोनपेठमार्गे हे पथक रेवली येथे गेले. पथकाला गाठण्यासाठी पीएसआय योगेश खटके यांच्या गाडीला धावपळ करावी लागली. रेवलीहून माजलगावच्या विश्रामगृहावर त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. परंतु, त्यांनी माजलगाव रद्द करून परळीच्या विश्रामगृहावर भोजन घेतले.

परळी तालुक्यातील रेवली येथील सरपंच मनोहर केदार यांच्या शेतास भेट दिली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर परळी विश्रमागृहावर जेवण करून सिरसाळा, वडवणी मार्गे  रस्त्यावरीलच बीड तालुक्यातील जरूड गावातील केशव काकडे यांच्या शेतास भेट देऊन इथेही जमलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. जरूडला येईपर्यंत सूर्यास्त झाला होता. संधिप्रकाशातच शेतकऱ्यांशी चर्चा करून बीड गाठले.  

दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या पथकात कोण ?दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकात केंद्रीय कृषी विभागाच्या योजना आयोगाचे सहसल्लागार मनीष चौधरी, पेयजल व स्वच्छता विभागाचे एस.सी. शर्मा, ग्रामविकास खात्याचे एस.एन. मिश्रा यांचा समावेश होता.  तसेच विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,  उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, कृषी अधीक्षक एम.एल. चपळेंसह महसूल, कृषी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. 

वैद्यनाथांचे दर्शनया पथकाचा बदललेला दौरा सोबत असणाऱ्या अनेकांना माहीत नव्हता. रेवलीहून हे पथक परळीत आले. वैद्यनाथांच्या दर्शनासाठी या पथकासोबत आलेला अधिकाऱ्यांचा ताफा पाहून मंदिरात भाविकांत कुतूहल निर्माण झाले. या सर्व अधिकाऱ्यांनी दर्शन घेऊन परळीचे विश्रामगृह  गाठले. 

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार