शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

माताबाळ मृत्यू प्रकरण;पोलिसांचे १२ प्रश्न, समितीने डॉक्टर दाम्पत्य दोषी असल्याचा दिला निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:58 IST

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले.

बीड : माजलगावातील सोनाली गायकवाड या मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर जाजू दाम्पत्याचा निष्काळजीपणा झाला आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून १२ प्रश्न विचारले होते. यात चार वगळता सर्वच ठिकाणी नकारात्मक अहवाल गेला. त्यामुळेच या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच वेळीच स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ उपलब्ध झाले असते तर मातेचा जीव वाचला असता, असा निष्कर्षही समितीने दिला आहे.

माजलगावातील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. यात रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष शहाणे, पाटाेद्याचे डॉ. सदाशिव राऊत व माजलगावचे डॉ. सुभाष बडे यांचा समावेश होता. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले. सोनाली यांना पहाटे चार वाजता झटका आला होता, तेव्हा प्रसूतीसाठी प्रगती झालेली नव्हती. हे पाहून लगेच तिचे सीझर अथवा पुढील संस्थेत पाठविणे आवश्यक होते. परंतु असे केले नाही. बाळाचे वजन साडेतीन केलो आहे हे माहिती असतानाही बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बोलावले नाही. प्रसूती गुंतागुंतीची झाल्याचे माहिती असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नाही. या सर्वांमध्ये हलगर्जी झाल्यानेच मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे हे डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले असून गुन्हा दाखल झाला.

स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. काकांनीही अडचणीतयाच रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ऑन कॉल म्हणून डॉ. सुनंदा काकांनी या होत्या. त्यांनी महिलेला तपासून पुढे पाठविण्यासह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जाजू दाम्पत्याला दिल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता दाम्पत्याची शस्त्रक्रिया करण्याइतपत पदवी झालेली नाही. तसेच स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही आणि सर्व गुंतागुंत माहिती असतानाही दुसऱ्यांना सल्ला का दिला, स्वत:च शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव का नाही वाचवला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या या जबाबामुळे डॉ. काकांनी यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.

दाम्पत्य अटकेत असल्याने बैठक पुढेसोनालीच्या मृत्यूमधील गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी दुपारी माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक बोलावली होती. परंतु डॉ. जाजू दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असल्याने आणि ते समोर उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सर्व माहिती घेतली. तसेच पाेलिसांनी आम्हाला १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्यासाठी तीन वैद्यकीय अधीक्षकांच्या समिती नियुक्त केली होती. चौकशी करूनच पोलिसांना अहवाल दिला. समितीच्या अहवालानुसार डॉ. जाजू दाम्पत्य हे दोषी असल्याचे सिद्ध होते. तसेच स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नसतानाही आणि प्रसूती गुंतागुंतीची झालेली आहे, हे माहिती असतानाही काहीच उपाययोजना न केल्याचे मतही समितीने नाेंदविले आहे.डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर