शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माताबाळ मृत्यू प्रकरण;पोलिसांचे १२ प्रश्न, समितीने डॉक्टर दाम्पत्य दोषी असल्याचा दिला निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:58 IST

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले.

बीड : माजलगावातील सोनाली गायकवाड या मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर जाजू दाम्पत्याचा निष्काळजीपणा झाला आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून १२ प्रश्न विचारले होते. यात चार वगळता सर्वच ठिकाणी नकारात्मक अहवाल गेला. त्यामुळेच या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच वेळीच स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ उपलब्ध झाले असते तर मातेचा जीव वाचला असता, असा निष्कर्षही समितीने दिला आहे.

माजलगावातील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. यात रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष शहाणे, पाटाेद्याचे डॉ. सदाशिव राऊत व माजलगावचे डॉ. सुभाष बडे यांचा समावेश होता. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले. सोनाली यांना पहाटे चार वाजता झटका आला होता, तेव्हा प्रसूतीसाठी प्रगती झालेली नव्हती. हे पाहून लगेच तिचे सीझर अथवा पुढील संस्थेत पाठविणे आवश्यक होते. परंतु असे केले नाही. बाळाचे वजन साडेतीन केलो आहे हे माहिती असतानाही बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बोलावले नाही. प्रसूती गुंतागुंतीची झाल्याचे माहिती असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नाही. या सर्वांमध्ये हलगर्जी झाल्यानेच मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे हे डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले असून गुन्हा दाखल झाला.

स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. काकांनीही अडचणीतयाच रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ऑन कॉल म्हणून डॉ. सुनंदा काकांनी या होत्या. त्यांनी महिलेला तपासून पुढे पाठविण्यासह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जाजू दाम्पत्याला दिल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता दाम्पत्याची शस्त्रक्रिया करण्याइतपत पदवी झालेली नाही. तसेच स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही आणि सर्व गुंतागुंत माहिती असतानाही दुसऱ्यांना सल्ला का दिला, स्वत:च शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव का नाही वाचवला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या या जबाबामुळे डॉ. काकांनी यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.

दाम्पत्य अटकेत असल्याने बैठक पुढेसोनालीच्या मृत्यूमधील गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी दुपारी माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक बोलावली होती. परंतु डॉ. जाजू दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असल्याने आणि ते समोर उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सर्व माहिती घेतली. तसेच पाेलिसांनी आम्हाला १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्यासाठी तीन वैद्यकीय अधीक्षकांच्या समिती नियुक्त केली होती. चौकशी करूनच पोलिसांना अहवाल दिला. समितीच्या अहवालानुसार डॉ. जाजू दाम्पत्य हे दोषी असल्याचे सिद्ध होते. तसेच स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नसतानाही आणि प्रसूती गुंतागुंतीची झालेली आहे, हे माहिती असतानाही काहीच उपाययोजना न केल्याचे मतही समितीने नाेंदविले आहे.डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर