शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

माताबाळ मृत्यू प्रकरण;पोलिसांचे १२ प्रश्न, समितीने डॉक्टर दाम्पत्य दोषी असल्याचा दिला निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:58 IST

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले.

बीड : माजलगावातील सोनाली गायकवाड या मातेसह बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर जाजू दाम्पत्याचा निष्काळजीपणा झाला आहे का? याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून १२ प्रश्न विचारले होते. यात चार वगळता सर्वच ठिकाणी नकारात्मक अहवाल गेला. त्यामुळेच या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच वेळीच स्त्रीरोग, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ उपलब्ध झाले असते तर मातेचा जीव वाचला असता, असा निष्कर्षही समितीने दिला आहे.

माजलगावातील घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी चौकशीसाठी समिती नियुक्त केली. यात रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष शहाणे, पाटाेद्याचे डॉ. सदाशिव राऊत व माजलगावचे डॉ. सुभाष बडे यांचा समावेश होता. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांसह इतर काय चुका झाल्या, याचा शोध घेण्यात आला. यात त्यांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा झाल्याचे दिसले. सोनाली यांना पहाटे चार वाजता झटका आला होता, तेव्हा प्रसूतीसाठी प्रगती झालेली नव्हती. हे पाहून लगेच तिचे सीझर अथवा पुढील संस्थेत पाठविणे आवश्यक होते. परंतु असे केले नाही. बाळाचे वजन साडेतीन केलो आहे हे माहिती असतानाही बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यांना बोलावले नाही. प्रसूती गुंतागुंतीची झाल्याचे माहिती असतानाही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावले नाही. या सर्वांमध्ये हलगर्जी झाल्यानेच मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे हे डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले असून गुन्हा दाखल झाला.

स्त्रीराेगतज्ज्ञ डॉ. काकांनीही अडचणीतयाच रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ ऑन कॉल म्हणून डॉ. सुनंदा काकांनी या होत्या. त्यांनी महिलेला तपासून पुढे पाठविण्यासह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला जाजू दाम्पत्याला दिल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. वास्तविक पाहता दाम्पत्याची शस्त्रक्रिया करण्याइतपत पदवी झालेली नाही. तसेच स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ असतानाही आणि सर्व गुंतागुंत माहिती असतानाही दुसऱ्यांना सल्ला का दिला, स्वत:च शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव का नाही वाचवला, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या या जबाबामुळे डॉ. काकांनी यादेखील अडचणीत सापडल्या आहेत.

दाम्पत्य अटकेत असल्याने बैठक पुढेसोनालीच्या मृत्यूमधील गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी दुपारी माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक बोलावली होती. परंतु डॉ. जाजू दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असल्याने आणि ते समोर उपस्थित राहू शकत नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सर्व माहिती घेतली. तसेच पाेलिसांनी आम्हाला १२ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे देण्यासाठी तीन वैद्यकीय अधीक्षकांच्या समिती नियुक्त केली होती. चौकशी करूनच पोलिसांना अहवाल दिला. समितीच्या अहवालानुसार डॉ. जाजू दाम्पत्य हे दोषी असल्याचे सिद्ध होते. तसेच स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ नसतानाही आणि प्रसूती गुंतागुंतीची झालेली आहे, हे माहिती असतानाही काहीच उपाययोजना न केल्याचे मतही समितीने नाेंदविले आहे.डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीडdoctorडॉक्टर