शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:05 IST

बेसुमार पाणीउपस्यावर प्रशासनाकडून कसलीही कारवाई नाही

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे पावसाळा संपला तेव्हा धरणात ८५ टक्के पाणी उपलब्ध होते. धरणाच्या पाण्यावर शेतीसाठी बेसुमार उपसा व बाष्पीभवन झाल्यामुळे मागील चार महिन्यांत ६२ टक्के पाणीसाठा कमी झाला. हे पाणी आरक्षित करणे आवश्यक असताना रात्रंदिवस या पाण्यावर उपसा सुरूच असताना प्रशासनाकडून काहीच कारवाई केली जात नाही.

माजलगाव धरणातून धरणाखालील भागातील शेतकऱ्यांसाठी रब्बीसाठी ३ व उन्हाळी २ पाणीपाळी कॅनालद्वारे देण्यात आली. तर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी तीनवेळा पाणी देण्यात आले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जानेवारी महिन्यात ६९.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यावेळी धरणात एकूण पाणीसाठा ३५८ दलघमी व २१६ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा होता. त्यावेळी ०.१७ दलघमी एवढे बाष्पीभवन होत होते. या धरणात बुधवारी धरणात ७.८२ टक्केच पाणी शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा हा २४.४० दलघमी आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा १६६.४० दलघमी एवढाच शिल्लक आहे. सध्या या धरणातून ०.२६ दलघमी एवढे बाष्पीभवन होत असल्याचे सांगण्यात आले.

बीड, माजलगाव शहरासह ८० गावांना वरदानमाजलगाव धरणातून बीड, माजलगाव शहरास ७० ते ८० गावांतील लोकांसाठी वरदान आहे. सध्या धरणाची पाण्याची पातळी केवळ आठ टक्के असतानाही येथून अवैधरीत्या पाणीउपसा केला जात आहे. असे असताना संबंधित विभागाचे अधिकारी व येथील महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणात पाणीउपसामाजलगाव धारणाखालोखाल असलेल्या सिंदफना व गोदावरी नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा सुरू असून, नदीपात्रातील पाणीचोरीवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरचतत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धरणातील पाणीउपसा करू नये, यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले होते. परंतु, त्यांच्याकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक धरणांमधून राजरोसपणे पाणीउपसा केला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर काही दिवसांत धरणे कोरडे पडण्याची भीती आहे.

पाणी आरक्षित नाहीधरणाचे पाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षित केले जाते. परंतु, सध्या तरी हे पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही. मागील वर्षभराच्या कार्यकाळात विनापरवाना चालणाऱ्या मोटारीवर एकही कारवाई करण्यात आलेली नाही.-प्रवीण चौघुले, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी