शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

माजलगाव धरणातून बेसुमार पाणीउपसा; हजारो मोटारी रात्रंदिवस सुरू, कारवाई कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:05 IST

बेसुमार पाणीउपस्यावर प्रशासनाकडून कसलीही कारवाई नाही

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे पावसाळा संपला तेव्हा धरणात ८५ टक्के पाणी उपलब्ध होते. धरणाच्या पाण्यावर शेतीसाठी बेसुमार उपसा व बाष्पीभवन झाल्यामुळे मागील चार महिन्यांत ६२ टक्के पाणीसाठा कमी झाला. हे पाणी आरक्षित करणे आवश्यक असताना रात्रंदिवस या पाण्यावर उपसा सुरूच असताना प्रशासनाकडून काहीच कारवाई केली जात नाही.

माजलगाव धरणातून धरणाखालील भागातील शेतकऱ्यांसाठी रब्बीसाठी ३ व उन्हाळी २ पाणीपाळी कॅनालद्वारे देण्यात आली. तर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी तीनवेळा पाणी देण्यात आले. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जानेवारी महिन्यात ६९.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यावेळी धरणात एकूण पाणीसाठा ३५८ दलघमी व २१६ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा होता. त्यावेळी ०.१७ दलघमी एवढे बाष्पीभवन होत होते. या धरणात बुधवारी धरणात ७.८२ टक्केच पाणी शिल्लक असून, उपयुक्त पाणीसाठा हा २४.४० दलघमी आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा १६६.४० दलघमी एवढाच शिल्लक आहे. सध्या या धरणातून ०.२६ दलघमी एवढे बाष्पीभवन होत असल्याचे सांगण्यात आले.

बीड, माजलगाव शहरासह ८० गावांना वरदानमाजलगाव धरणातून बीड, माजलगाव शहरास ७० ते ८० गावांतील लोकांसाठी वरदान आहे. सध्या धरणाची पाण्याची पातळी केवळ आठ टक्के असतानाही येथून अवैधरीत्या पाणीउपसा केला जात आहे. असे असताना संबंधित विभागाचे अधिकारी व येथील महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणात पाणीउपसामाजलगाव धारणाखालोखाल असलेल्या सिंदफना व गोदावरी नदीपात्रातूनदेखील मोठ्या प्रमाणावर पाणीउपसा सुरू असून, नदीपात्रातील पाणीचोरीवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरचतत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धरणातील पाणीउपसा करू नये, यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिले होते. परंतु, त्यांच्याकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक धरणांमधून राजरोसपणे पाणीउपसा केला जात आहे. हे असेच सुरू राहिले तर काही दिवसांत धरणे कोरडे पडण्याची भीती आहे.

पाणी आरक्षित नाहीधरणाचे पाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरक्षित केले जाते. परंतु, सध्या तरी हे पाणी आरक्षित करण्यात आलेले नाही. मागील वर्षभराच्या कार्यकाळात विनापरवाना चालणाऱ्या मोटारीवर एकही कारवाई करण्यात आलेली नाही.-प्रवीण चौघुले, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी