शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत मराठ्यांचा जागर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:50 IST

एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली.

अंबाजोगाई : एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली. या गोंधळात मराठा तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंत सर्व जबाबदारी तरुणांनी यशस्वीरीत्या आणि अंबाजोगाईच्या परंपरेला साजेशी पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.

अतिशय शांततेत आणि शिस्तीचे प्रदर्शन घडवीत ५८ मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांवर विचार होत नसल्याने मागील महिन्यापासून क्रांती मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाले आहे. गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले. राज्यात आगडोंब उसळला, नंतरही अनेक  आत्महत्या झाल्या. याचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांनी आज जागर गोंधळ आयोजित केला होता. 

यानिमित्ताने आयोजित रैलीत हजारो तरुणांनी सहभाग नोंदविला. नगर परिषद कॉम्प्लेक्सपासून या रैलीस सुरुवात झाली. पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. 

यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षणाबाबत संथ भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. यावेळी मुस्लीम समाजातर्फे आंदोलाकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह संपूर्ण वेळ आंदोलनकर्त्यांसोबत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले. 

काय आहेत मागण्या?मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार