शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत मराठ्यांचा जागर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:50 IST

एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली.

अंबाजोगाई : एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली. या गोंधळात मराठा तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंत सर्व जबाबदारी तरुणांनी यशस्वीरीत्या आणि अंबाजोगाईच्या परंपरेला साजेशी पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.

अतिशय शांततेत आणि शिस्तीचे प्रदर्शन घडवीत ५८ मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांवर विचार होत नसल्याने मागील महिन्यापासून क्रांती मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाले आहे. गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले. राज्यात आगडोंब उसळला, नंतरही अनेक  आत्महत्या झाल्या. याचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांनी आज जागर गोंधळ आयोजित केला होता. 

यानिमित्ताने आयोजित रैलीत हजारो तरुणांनी सहभाग नोंदविला. नगर परिषद कॉम्प्लेक्सपासून या रैलीस सुरुवात झाली. पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. 

यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षणाबाबत संथ भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. यावेळी मुस्लीम समाजातर्फे आंदोलाकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह संपूर्ण वेळ आंदोलनकर्त्यांसोबत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले. 

काय आहेत मागण्या?मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार