शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईत मराठ्यांचा जागर गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:50 IST

एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली.

अंबाजोगाई : एक मराठा, लाख मराठा या घोषणेसह आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने केलेल्या जागर गोंधळामुळे अवघी अंबानागरी दुमदुमून गेली. या गोंधळात मराठा तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होता. या आंदोलनाच्या आयोजनापासून ते समारोपापर्यंत सर्व जबाबदारी तरुणांनी यशस्वीरीत्या आणि अंबाजोगाईच्या परंपरेला साजेशी पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.

अतिशय शांततेत आणि शिस्तीचे प्रदर्शन घडवीत ५८ मोर्चे काढूनही समाजाच्या मागण्यांवर विचार होत नसल्याने मागील महिन्यापासून क्रांती मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चात झाले आहे. गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले. राज्यात आगडोंब उसळला, नंतरही अनेक  आत्महत्या झाल्या. याचा निषेध आणि आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील तरुणांनी आज जागर गोंधळ आयोजित केला होता. 

यानिमित्ताने आयोजित रैलीत हजारो तरुणांनी सहभाग नोंदविला. नगर परिषद कॉम्प्लेक्सपासून या रैलीस सुरुवात झाली. पाटील चौक, योगेश्वरी देवी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी थांबून जागर गोंधळ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेतील कलाकारांनी जागर गोंधळाद्वारे आरक्षणाची मागणी केली. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण भाषणे केली. 

यावेळी तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षणाबाबत संथ भूमिका घेणाऱ्या सरकारचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता झाली. यावेळी मुस्लीम समाजातर्फे आंदोलाकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी फौजफाट्यासह संपूर्ण वेळ आंदोलनकर्त्यांसोबत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले. 

काय आहेत मागण्या?मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, आरक्षण घोषित केल्याशिवाय मेगाभरती प्रक्रिया सुरु करू नये, मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, शहीद मराठा बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरी द्यावी, जिल्हा स्तरावर मराठा वसतिगृहाची तत्काळ निर्मिती करावी, मराठा विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी तत्काळ एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनState Governmentराज्य सरकार