शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:00 IST

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर फरार आरोपींना अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की, "मी उद्या परभणीतील मृत तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देणार आहे आणि त्यानंतर मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसंच २८ डिसेंबर रोजी जनतेनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. हा जनतेचा मोर्चा असल्याने मीदेखील त्यामध्ये जाणार आहे. कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही," अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यवाही सुरू केली आहे. "कोणीही दबावाखाली काम करू नका. राजकीय नेत्यांचे ऐकू नका. जर काही असेल तर थेट मला सांगा. सर्वांनी बिनधास्त काम करा," अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या. पदभार घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी पहिली क्राईम मीटिंग घेतली. यावेळी त्यांनी ठाणेदारांना आधार देण्यासह अप्रत्यक्ष कारवाईचा इशाराही दिला. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभर गाजला. यातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. याच प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत काँवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. 

शनिवारी रात्री साडेदहा वाजता पदभार घेतल्यानंतर रविवारी लगेच कामाला सुरुवात केली. सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सर्वांचा परिचय करून घेतला. त्यानंतर त्यांनी सर्वांना विश्वासात घेत काही सूचना केल्या. आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, कारवाया करा, राजकीय नेत्यांचे ऐकू नका, काहीही असेल तर मला सांगा, बिनधास्त काम करा, हलगर्जी झाली तर तोंडाने बोलणार नाही, पण कागदावर कारवाई करेन, असा इशाराही दिला. तसेच गुन्हेगारी संपवून बीडचे नाव चांगले करायचे आहे, त्यामुळे सर्वांनी निर्भयी वातावरणात काम करावे, असेही काँवत यांनी सर्वांना सांगितले. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता तिडके यांच्यासह उपअधीक्षक, ठाणेदार व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४