शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:00 IST

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर फरार आरोपींना अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की, "मी उद्या परभणीतील मृत तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देणार आहे आणि त्यानंतर मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसंच २८ डिसेंबर रोजी जनतेनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. हा जनतेचा मोर्चा असल्याने मीदेखील त्यामध्ये जाणार आहे. कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही," अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यवाही सुरू केली आहे. "कोणीही दबावाखाली काम करू नका. राजकीय नेत्यांचे ऐकू नका. जर काही असेल तर थेट मला सांगा. सर्वांनी बिनधास्त काम करा," अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या. पदभार घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी पहिली क्राईम मीटिंग घेतली. यावेळी त्यांनी ठाणेदारांना आधार देण्यासह अप्रत्यक्ष कारवाईचा इशाराही दिला. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभर गाजला. यातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. याच प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत काँवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. 

शनिवारी रात्री साडेदहा वाजता पदभार घेतल्यानंतर रविवारी लगेच कामाला सुरुवात केली. सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सर्वांचा परिचय करून घेतला. त्यानंतर त्यांनी सर्वांना विश्वासात घेत काही सूचना केल्या. आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, कारवाया करा, राजकीय नेत्यांचे ऐकू नका, काहीही असेल तर मला सांगा, बिनधास्त काम करा, हलगर्जी झाली तर तोंडाने बोलणार नाही, पण कागदावर कारवाई करेन, असा इशाराही दिला. तसेच गुन्हेगारी संपवून बीडचे नाव चांगले करायचे आहे, त्यामुळे सर्वांनी निर्भयी वातावरणात काम करावे, असेही काँवत यांनी सर्वांना सांगितले. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता तिडके यांच्यासह उपअधीक्षक, ठाणेदार व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४