शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:00 IST

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. या पार्श्वभूमीवर फरार आरोपींना अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की, "मी उद्या परभणीतील मृत तरुणाच्या कुटुंबीयांना भेट देणार आहे आणि त्यानंतर मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसंच २८ डिसेंबर रोजी जनतेनं बीडमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. हा जनतेचा मोर्चा असल्याने मीदेखील त्यामध्ये जाणार आहे. कोणाचाही बाप आला तरी हे मॅटर मी दबू देणार नाही," अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कार्यवाही सुरू केली आहे. "कोणीही दबावाखाली काम करू नका. राजकीय नेत्यांचे ऐकू नका. जर काही असेल तर थेट मला सांगा. सर्वांनी बिनधास्त काम करा," अशा सूचना पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ठाणेदारांना दिल्या. पदभार घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी पहिली क्राईम मीटिंग घेतली. यावेळी त्यांनी ठाणेदारांना आधार देण्यासह अप्रत्यक्ष कारवाईचा इशाराही दिला. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा राज्यभर गाजला. यातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. याच प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत नवनीत काँवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. 

शनिवारी रात्री साडेदहा वाजता पदभार घेतल्यानंतर रविवारी लगेच कामाला सुरुवात केली. सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी सुरुवातीला सर्वांचा परिचय करून घेतला. त्यानंतर त्यांनी सर्वांना विश्वासात घेत काही सूचना केल्या. आपल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा, कारवाया करा, राजकीय नेत्यांचे ऐकू नका, काहीही असेल तर मला सांगा, बिनधास्त काम करा, हलगर्जी झाली तर तोंडाने बोलणार नाही, पण कागदावर कारवाई करेन, असा इशाराही दिला. तसेच गुन्हेगारी संपवून बीडचे नाव चांगले करायचे आहे, त्यामुळे सर्वांनी निर्भयी वातावरणात काम करावे, असेही काँवत यांनी सर्वांना सांगितले. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता तिडके यांच्यासह उपअधीक्षक, ठाणेदार व इतर शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४