शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:27 IST

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे

- मधुकर सिरसटकेज ( बीड): धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात आवक वाढून लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. संततधार पाऊस आणि आवक लक्षात घेता शुक्रवारी (दि.२७ ) पहाटे धरणाचे एकूण सहा वक्रदरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदी पात्रात ५ हजार २४१ क्युसेक (१४८. ४४) इतका विसर्ग सूरू असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनीधाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते.

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे.

नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावेजलाशयातून तब्बल ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याने मांजरा नदीला पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. - राकेश गिड्डे, तहसीलदार, केज

जलपुजनासाठी स्पर्धा...मांजरा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत होताच जलपुजनासाठी राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांच्यात स्पर्धा सुरू झाली. दरम्यान, राहुल खोडसे यांनी गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पंचक्रोशीतील शेतकरी एकत्र करून जलपुजन केले. तर आ. नमीता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सुनील गलांडे पाटील, तालुकाध्यक्ष भगवान केदार, दिलीप भिसे, रहिमभाई शेख व  तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साडेदहा वाजता जलपूजन केले. जलपुजनाच्या नावाखाली तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीRainपाऊसBeedबीड