शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरण पातळी ८ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:45 IST

दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

माजलगाव : दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने पुढील काळात नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.माजलगाव शहर व ११ खेड्यांना माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत असल्याने धरण भरणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण केवळ मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्यानंतर पाऊस न पडल्याने ऐन पावसाळ्यातच धरण परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी वापरल्याने येथील पातळीत घट झाली होती. पावसाळ्यानंतर शासनाने या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले होते. परंतु बाष्पीभवन व शेतीसाठी बेसुमार उपसा झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली.सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने पातळी दररोज खालावत चालली आहे. याचा फटका शहरवासियांसह अनेक गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याची पाणी पातळी खालावल्याने टाकी भरण्यास दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या नगरपालिकेने धरणातून बांध खोदून विहिरीत पाणी घेतले जात आहे. मात्र, पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने हे पाणी बांधाद्वारे किती दिवस पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप पावसाळा सुरु होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागत असल्याने पातळी किती खालावते यावर अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.माजलगाव धरण १८ टक्क्यींनी कमीमाजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो.९ एप्रिल रोजी धरणाची पाणी पातळी ४२४.०९ मीटर एवढी झाली आहे. जवळपास ८ मीटरने पातळी कमी आहे. सध्या धरणाची टक्केवारी (- १८ टक्के) असून धरणामध्ये ८७.८० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.पुढील अडीच महीन्यात पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळता ३० जूनपर्यंत ५० दलघमी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता बी. आर. शेख यांनी व्यक्त केली आहे.सद्य परिस्थिती पाहता पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater scarcityपाणी टंचाई