शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

माजलगाव धरण पातळी ८ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:45 IST

दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

माजलगाव : दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने पुढील काळात नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.माजलगाव शहर व ११ खेड्यांना माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत असल्याने धरण भरणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण केवळ मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्यानंतर पाऊस न पडल्याने ऐन पावसाळ्यातच धरण परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी वापरल्याने येथील पातळीत घट झाली होती. पावसाळ्यानंतर शासनाने या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले होते. परंतु बाष्पीभवन व शेतीसाठी बेसुमार उपसा झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली.सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने पातळी दररोज खालावत चालली आहे. याचा फटका शहरवासियांसह अनेक गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याची पाणी पातळी खालावल्याने टाकी भरण्यास दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या नगरपालिकेने धरणातून बांध खोदून विहिरीत पाणी घेतले जात आहे. मात्र, पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने हे पाणी बांधाद्वारे किती दिवस पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप पावसाळा सुरु होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागत असल्याने पातळी किती खालावते यावर अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.माजलगाव धरण १८ टक्क्यींनी कमीमाजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो.९ एप्रिल रोजी धरणाची पाणी पातळी ४२४.०९ मीटर एवढी झाली आहे. जवळपास ८ मीटरने पातळी कमी आहे. सध्या धरणाची टक्केवारी (- १८ टक्के) असून धरणामध्ये ८७.८० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.पुढील अडीच महीन्यात पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळता ३० जूनपर्यंत ५० दलघमी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता बी. आर. शेख यांनी व्यक्त केली आहे.सद्य परिस्थिती पाहता पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater scarcityपाणी टंचाई