शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माजलगाव धरण पातळी ८ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:45 IST

दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

माजलगाव : दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने पुढील काळात नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.माजलगाव शहर व ११ खेड्यांना माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत असल्याने धरण भरणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण केवळ मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्यानंतर पाऊस न पडल्याने ऐन पावसाळ्यातच धरण परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी वापरल्याने येथील पातळीत घट झाली होती. पावसाळ्यानंतर शासनाने या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले होते. परंतु बाष्पीभवन व शेतीसाठी बेसुमार उपसा झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली.सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने पातळी दररोज खालावत चालली आहे. याचा फटका शहरवासियांसह अनेक गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याची पाणी पातळी खालावल्याने टाकी भरण्यास दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या नगरपालिकेने धरणातून बांध खोदून विहिरीत पाणी घेतले जात आहे. मात्र, पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने हे पाणी बांधाद्वारे किती दिवस पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप पावसाळा सुरु होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागत असल्याने पातळी किती खालावते यावर अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.माजलगाव धरण १८ टक्क्यींनी कमीमाजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो.९ एप्रिल रोजी धरणाची पाणी पातळी ४२४.०९ मीटर एवढी झाली आहे. जवळपास ८ मीटरने पातळी कमी आहे. सध्या धरणाची टक्केवारी (- १८ टक्के) असून धरणामध्ये ८७.८० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.पुढील अडीच महीन्यात पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळता ३० जूनपर्यंत ५० दलघमी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता बी. आर. शेख यांनी व्यक्त केली आहे.सद्य परिस्थिती पाहता पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater scarcityपाणी टंचाई