शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

माजलगाव धरण पातळी ८ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:45 IST

दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.

माजलगाव : दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने पुढील काळात नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.माजलगाव शहर व ११ खेड्यांना माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत असल्याने धरण भरणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण केवळ मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्यानंतर पाऊस न पडल्याने ऐन पावसाळ्यातच धरण परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी वापरल्याने येथील पातळीत घट झाली होती. पावसाळ्यानंतर शासनाने या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले होते. परंतु बाष्पीभवन व शेतीसाठी बेसुमार उपसा झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली.सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने पातळी दररोज खालावत चालली आहे. याचा फटका शहरवासियांसह अनेक गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याची पाणी पातळी खालावल्याने टाकी भरण्यास दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या नगरपालिकेने धरणातून बांध खोदून विहिरीत पाणी घेतले जात आहे. मात्र, पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने हे पाणी बांधाद्वारे किती दिवस पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप पावसाळा सुरु होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागत असल्याने पातळी किती खालावते यावर अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.माजलगाव धरण १८ टक्क्यींनी कमीमाजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो.९ एप्रिल रोजी धरणाची पाणी पातळी ४२४.०९ मीटर एवढी झाली आहे. जवळपास ८ मीटरने पातळी कमी आहे. सध्या धरणाची टक्केवारी (- १८ टक्के) असून धरणामध्ये ८७.८० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.पुढील अडीच महीन्यात पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळता ३० जूनपर्यंत ५० दलघमी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता बी. आर. शेख यांनी व्यक्त केली आहे.सद्य परिस्थिती पाहता पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणwater scarcityपाणी टंचाई