शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

माजलगाव धरण अदयापही निम्मे रिकामेच; कमी पावसाने आवक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:39 IST

माजलगाव तालुका व धरण परिसरात मागील दोन महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): यावर्षी पाहिजे तसा पाऊस नसल्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत धीम्या गतीने वाढू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना देखील अद्याप धरण निम्याने रिकामेच आहे. मागील तीन-चार वर्षात हे धरण परतीच्या पावसावरच पूर्ण क्षमतेने भरले होते. आता जेवढा पाण्याचा साठा आहे एवढे पाणी वर्षभर पुरू शकते.

गेल्या वर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने 2 जून रोजीच धरणाच्या पाण्यात 2 टक्के वाढ झाली होती.मध्यतरी कमी पाऊस झाल्याने हे धरण भरेल की नाही असे वाटत असतांना परतीच्या पावसाने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जवळपास दीड महिना धरणातून पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात आले होते. यामुळे कडक उन्हाळ्यात देखील तालुक्यात कोठेही टँकर सुरू करण्याची गरज पडली नव्हती.9 जून रोजी माजलगाव धरणाची पाणी पातळी 428.20 मीटर होती.यावेळी धरणातील एकुन पाणीसाठा 229 दलघमी होता तर 87 दलघमी ऐवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता.त्यामुळे पाण्याची टक्केवारी ही 27.88 ऐवढी होती. 

माजलगाव तालुका व धरण परिसरात मागील दोन महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरणात 28 टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना व उजव्या कालव्याद्वारे  नाथसागर धरणातून मागील 15-20 दिवसांपासून पाणी सोडण्यात असतांना देखील माजलगाव धरणात केवळ 22 टक्केच पाणीसाठयात वाढ झाली. पैठणचे नाथ सागर धरण भरण्यापूर्वीच हे धरण भरून वाहत असते परंतु पैठणच्या धरणाचे पाणी अनेक दिवस गोदावरी पात्रात सोडलेले असताना देखील माजलगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

सोमवारी सकाळी माजलगाव धरणाची पाणी पातळी 429.52 मीटर झाली त्यामुळे एकूण पाणीसाठा 298.20 दलघमी ऐवढा झाला आहे , तर धरणात जिवंत पाणीसाठा 156.20 दलघमी एवढा झाला आहे.यामुळे हे धरण केवळ 50.06 टक्के भरले असल्याची माहिती धरणाचे कनिष्ठ अभियंता बी. आर. शेख यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊस