शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 18:04 IST

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत

ठळक मुद्देशेतकरी वर्गात आनंद

माजलगाव (बीड ) : मागील पधरवाड्यात झालेला दमदार पाऊस तसेच धरण परिसरात सोमवारी  सायंकाळी  झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली. मंगळवारी दुपारपर्यंत धरणाची पाणी पातळी १२ टक्के झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

अनेक वेळा परतीच्या पावसाने मृत साठयात असलेले हे धरण पूर्ण भरले आहे. मागील १५ दिवसात परतीचा दमदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ पहावयास मिळाली. ७ ऑक्टोबर रोजी हे धरण मृत साठयातुन बाहेर पडले. यावेळी या धरणात ४२६.११ मीटर एवढा पाणी साठा झाला होता. मंगळवारी दुपारी या धरणात ४२६.५६  मीटर पाणी पातळी होती  व एकूण पाणीसाठा हा १५८  दलघमी एवढा होता तर ५.२६ टक्के एवठा पाणी साठा उपलब्ध होता. २४ तासात पाणी पातळीत वाढ होऊन ती ४२७.१०  मीटर झाली होती तर धरणात एकूण पाणीसाठा १८०  दलघमी झाला. यामुळे टक्केवारीत वाढ होऊन १२.१८  झाली आहे. परतीच्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपला तेव्हा धरणात एकूण १२६.१० दलघमी पाणी साठा होता. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसWaterपाणीBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरण