शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता सामान्य मराठा समाजाची नसून फक्त १६९ घराण्यांच्या हातात आहे. हे मंत्री, आमदार, खासदार, पाहिले तर सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही घराणेशाही मोडीत काडण्याची गरज असल्याचे सांगून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.शनिवारी बीड येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संवाद निर्धार’ या जाहीर सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी.आ. हरीभाऊ भदे, बबन वडमारे, शेख निजाम, सचिन माळी, किसन चव्हाण, मुफ्ती कामेद, डॉ. इंदरकुमार भिसे, विष्णू देवकते, अमीत भुइंगळ, गंगाभीषण थावरे, सुशीला मोराळे, शीतल साठे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपच्या हातात दुसऱ्या वेळी सत्ता दिली मात्र त्यांना सरकार चालवता येत नाही. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना जोपासण्याचे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडवायला सरकारकडे पैसा नाही. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेही दगलबाज आहेत. नोटाबंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी बँकामधून भाजप दलालांच्या माध्यमातून ४० टक्के प्रमाणे रक्कम देऊन हा पैसा पांढरा केला आहे. हाच पैसा मतदारांना खरेदी करण्यासाठी वापरला जातोय, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले. नदीपात्रात घेतलेल्या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.क्षीरसागरांची भांडणं फक्त लोकांना दाखवण्यासाठीसंदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील भांडणं ही लोकांना दाखवण्यासाठी आहेत. तसेच इतर पर्याय उपलब्ध होऊ नये यासाठी ही नाटकं केली जात आहेत, सत्तेसाठी क्षीरसागर काहीही करु शकतात अशी टीका एएमआयएमचे जिल्हाअध्यक्ष शेख निजाम यांनी केली.

टॅग्स :BeedबीडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस