शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेली अनेक वर्षे झाले महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात आहे, मात्र ही सत्ता सामान्य मराठा समाजाची नसून फक्त १६९ घराण्यांच्या हातात आहे. हे मंत्री, आमदार, खासदार, पाहिले तर सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ही घराणेशाही मोडीत काडण्याची गरज असल्याचे सांगून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली.शनिवारी बीड येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ‘सत्ता संवाद निर्धार’ या जाहीर सभेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी.आ. हरीभाऊ भदे, बबन वडमारे, शेख निजाम, सचिन माळी, किसन चव्हाण, मुफ्ती कामेद, डॉ. इंदरकुमार भिसे, विष्णू देवकते, अमीत भुइंगळ, गंगाभीषण थावरे, सुशीला मोराळे, शीतल साठे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपच्या हातात दुसऱ्या वेळी सत्ता दिली मात्र त्यांना सरकार चालवता येत नाही. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना जोपासण्याचे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यांचे प्रश्न सोडवायला सरकारकडे पैसा नाही. भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेही दगलबाज आहेत. नोटाबंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले. मात्र, ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी बँकामधून भाजप दलालांच्या माध्यमातून ४० टक्के प्रमाणे रक्कम देऊन हा पैसा पांढरा केला आहे. हाच पैसा मतदारांना खरेदी करण्यासाठी वापरला जातोय, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले. नदीपात्रात घेतलेल्या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.क्षीरसागरांची भांडणं फक्त लोकांना दाखवण्यासाठीसंदीप क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील भांडणं ही लोकांना दाखवण्यासाठी आहेत. तसेच इतर पर्याय उपलब्ध होऊ नये यासाठी ही नाटकं केली जात आहेत, सत्तेसाठी क्षीरसागर काहीही करु शकतात अशी टीका एएमआयएमचे जिल्हाअध्यक्ष शेख निजाम यांनी केली.

टॅग्स :BeedबीडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस