शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Election 2019 : धोंडे ऐतिहासिक रेकॉर्ड करणार की आजबे बाजी मारणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:44 IST

आष्टीत रंगणार दुरंगी लढत 

ठळक मुद्देनऊ उमेदवार मैदानातआष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात विभागलेला मतदारसंघ

- अविनाश कदम

आष्टी विधानसभा मतदारसंघ हा आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याचा मिळवून हा भौगोलिकदृष्ट्या मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. या संघातील पुरूष मतदार १ लाख ९६ हजार ५१३ स्त्री मतदार १ लाख ७३ हजार ५४५ मतदार असे एकूण ३ लाख ७० हजार ५८ असे एकूण मतदार आहेत. ४३८ मतदान केंद्र आहेत. अंतिम रिंगणात आ. भीमराव धोंडे भाजप, बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णू गाडेकर बहुजन समाजपक्ष, नामदेव सानप वंचित बहुजन आघाडी, राजाभाऊ देशमुख लोकतांत्रिक आघाडी, संजय खांडेकर लोकसेवा पार्टी, दादा तासतोडे अपक्ष, ज्ञानदेव थोरवे अपक्ष, तुकाराम काळे आंबेडकरराईट आॅफ पार्टी हे नऊ उमेदवारांत लढत होणार आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर चार वेळा आमदार होण्याचा मान भाजपचे उमेदवार आ. भीमराव धोडे यांनी मिळविला आहे. त्या पाठोपाठ दुसरा मान आ. सुरेश धस यांनी तीनवेळा विधानसभा तर एक वेळा विधान परिषद जिंकली. चार वेळा आमदार आता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आ.धोंडे निवडून आले तर ऐतिहासिक रेकॉर्ड होईल. 

आष्टी विधानसभा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या आ. भीमराव धोडे यांनी राकाँचे उमेदवार आ. सुरेश धस यांचा थोड्या मताने पराभव केला. त्यावेळी बाळासाहेब आजबे यांनी भाजपाच्या उमेदवारी मिळविण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडे प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळ आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी आ. साहेबराव दरेकर, जयदत धस, अमोल तरटे यांना पंकजा मुंडे व पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश शिंदे यांनाही ऐनवेळी माघार घ्यावी लागली. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- आष्टी तालुक्यात सतत पाणी टंचाईसाठी उपाययोजना काहीच नाही मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. युवकांना रोजगारासाठी ओद्योगिक वसाहत, कडा कारखाना आणि सूतगिरणी सुरू होणार की नाही? याबाबत साशंकता असून, पाणी टंचाईचा प्रश्न मुख्य आहे.- राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या तालुक्याच्या गावाला स्टेडियम नाही, आष्टी व कडा बसस्थानकाची दुरवस्था निधी मंजूर झाला तरी कामाला सुरु वात झाली नाही. यामुळे खेळाडूंना सराव करणे अवघड होऊन बसले आहे. याकडे मात्र दुर्लक्षच आहे.- हा मतदारसंघ दुष्काळी भागात  येतो. बहुतांश मतदार हे शेतमजूर, उसतोड कामगार आहेत. या भागात नेहमीच पर्जन्यमान अतिशय कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शेतीसाठी पाण्याचा विचारच करू शकत नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात कुणालाही यश आले नाही.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूभीमराव धोंडे (भाजपा)- मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था, बहुतांशी ग्रामपंचायती, कृउबा या संस्था भाजपच्या ताब्यात  - शांत व संयमी अशी ओळख असल्याने वीस वर्षे आमदार राहिले. - पाच वर्षांत राज्य व केंद्राच्या  माध्यमातून कोट्यवधींची रस्ते व विकास कामे केली.

बाळासाहेब आजबे (रा.काँ.)- माजी आमदार भाऊसाहेब आजबे यांचे चिरंजीव अन् नि:स्वार्थ स्वभाव.- जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतात. - भाजपमध्ये असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांना निष्ठेने साथ दिली. - सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात. 

नामदेव सानप (वंचित बहुजन आ.)- मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून ओळख असल्याने फायदा - पाटोदा तालुक्यातील जनतेला हक्काचा उमेदवार मिळाला - बलाढ्य उमेदवार एकीकडे आहेत. - सर्वसामान्य म्हणून वंचिताचे हक्काचे उमेदवार असल्याने मतदारांच्या भेटी घेत आहेत.

राजाभाऊ देशमुख (लोकतांत्रिक जनता दल)- मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले - १९७५ मध्ये मराठवाडा विकासाच्या प्रश्नांवर एक महिना भर जेल मध्ये होते. - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव आहे. - मतदारांना आपले विचार प्रचारात पटवून सांगत आहेत.

2०14 चे चित्रभीमराव धोंडे (भाजपा-विजयी)  सुरेश धस (राकाँ -पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Beedबीडashti-acआष्टीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस