शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
4
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
5
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
6
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
7
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
8
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
9
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
10
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
11
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
12
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
13
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
14
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
15
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
16
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
17
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
18
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
19
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
20
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

Maharashtra Election 2019 : धोंडे ऐतिहासिक रेकॉर्ड करणार की आजबे बाजी मारणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:44 IST

आष्टीत रंगणार दुरंगी लढत 

ठळक मुद्देनऊ उमेदवार मैदानातआष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात विभागलेला मतदारसंघ

- अविनाश कदम

आष्टी विधानसभा मतदारसंघ हा आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्याचा मिळवून हा भौगोलिकदृष्ट्या मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. या संघातील पुरूष मतदार १ लाख ९६ हजार ५१३ स्त्री मतदार १ लाख ७३ हजार ५४५ मतदार असे एकूण ३ लाख ७० हजार ५८ असे एकूण मतदार आहेत. ४३८ मतदान केंद्र आहेत. अंतिम रिंगणात आ. भीमराव धोंडे भाजप, बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस, विष्णू गाडेकर बहुजन समाजपक्ष, नामदेव सानप वंचित बहुजन आघाडी, राजाभाऊ देशमुख लोकतांत्रिक आघाडी, संजय खांडेकर लोकसेवा पार्टी, दादा तासतोडे अपक्ष, ज्ञानदेव थोरवे अपक्ष, तुकाराम काळे आंबेडकरराईट आॅफ पार्टी हे नऊ उमेदवारांत लढत होणार आहे.

आष्टी विधानसभा निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहिला तर चार वेळा आमदार होण्याचा मान भाजपचे उमेदवार आ. भीमराव धोडे यांनी मिळविला आहे. त्या पाठोपाठ दुसरा मान आ. सुरेश धस यांनी तीनवेळा विधानसभा तर एक वेळा विधान परिषद जिंकली. चार वेळा आमदार आता मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आ.धोंडे निवडून आले तर ऐतिहासिक रेकॉर्ड होईल. 

आष्टी विधानसभा २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या आ. भीमराव धोडे यांनी राकाँचे उमेदवार आ. सुरेश धस यांचा थोड्या मताने पराभव केला. त्यावेळी बाळासाहेब आजबे यांनी भाजपाच्या उमेदवारी मिळविण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडे प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी माघार घ्यावी लागली. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळ आहे. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी आ. साहेबराव दरेकर, जयदत धस, अमोल तरटे यांना पंकजा मुंडे व पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश शिंदे यांनाही ऐनवेळी माघार घ्यावी लागली. 

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- आष्टी तालुक्यात सतत पाणी टंचाईसाठी उपाययोजना काहीच नाही मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. युवकांना रोजगारासाठी ओद्योगिक वसाहत, कडा कारखाना आणि सूतगिरणी सुरू होणार की नाही? याबाबत साशंकता असून, पाणी टंचाईचा प्रश्न मुख्य आहे.- राज्य राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या तालुक्याच्या गावाला स्टेडियम नाही, आष्टी व कडा बसस्थानकाची दुरवस्था निधी मंजूर झाला तरी कामाला सुरु वात झाली नाही. यामुळे खेळाडूंना सराव करणे अवघड होऊन बसले आहे. याकडे मात्र दुर्लक्षच आहे.- हा मतदारसंघ दुष्काळी भागात  येतो. बहुतांश मतदार हे शेतमजूर, उसतोड कामगार आहेत. या भागात नेहमीच पर्जन्यमान अतिशय कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. शेतीसाठी पाण्याचा विचारच करू शकत नाहीत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात कुणालाही यश आले नाही.

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूभीमराव धोंडे (भाजपा)- मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्था, बहुतांशी ग्रामपंचायती, कृउबा या संस्था भाजपच्या ताब्यात  - शांत व संयमी अशी ओळख असल्याने वीस वर्षे आमदार राहिले. - पाच वर्षांत राज्य व केंद्राच्या  माध्यमातून कोट्यवधींची रस्ते व विकास कामे केली.

बाळासाहेब आजबे (रा.काँ.)- माजी आमदार भाऊसाहेब आजबे यांचे चिरंजीव अन् नि:स्वार्थ स्वभाव.- जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतात. - भाजपमध्ये असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांना निष्ठेने साथ दिली. - सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरतात. 

नामदेव सानप (वंचित बहुजन आ.)- मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून ओळख असल्याने फायदा - पाटोदा तालुक्यातील जनतेला हक्काचा उमेदवार मिळाला - बलाढ्य उमेदवार एकीकडे आहेत. - सर्वसामान्य म्हणून वंचिताचे हक्काचे उमेदवार असल्याने मतदारांच्या भेटी घेत आहेत.

राजाभाऊ देशमुख (लोकतांत्रिक जनता दल)- मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन केले - १९७५ मध्ये मराठवाडा विकासाच्या प्रश्नांवर एक महिना भर जेल मध्ये होते. - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव आहे. - मतदारांना आपले विचार प्रचारात पटवून सांगत आहेत.

2०14 चे चित्रभीमराव धोंडे (भाजपा-विजयी)  सुरेश धस (राकाँ -पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Beedबीडashti-acआष्टीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस