शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:36 IST

Maharashtra Election 2019: पाच वर्षात हिताचे एकही काम नाही; कार्यकाळ केवळ आश्वासनातच घालवला

ठळक मुद्देसत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज सरकारला नव्या पिढीची चिंता नाही तरूण पिढीच सत्ता परिवर्तन करेलमुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौन 

अंबाजोगाई : भाजपा -सेना युतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ केवळ आश्वासनातच गेला. राज्याच्या हिताचे एकही काम झाले नाही. अशा सरकारला घरी पाठवून राज्यात परिवर्तन आणण्यासाठी  नव्या पिढीने ही निवडणूक हाती घेतली आहे. सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

केज  व परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे व आ. धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर  शरद पवार यांची सभा झाली. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, डॉ. नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे, अनंतराव जगतकर, उल्हास पांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे विजयी वातावरण दिसू लागल्याने पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना इथे येण्याची वेळ आली. मोदी व शहा यांची एकही सभा माझे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतकी धास्ती त्यांनी घेतली आहे. झोपेतही ते माझे नाव घ्यायला विसरत नसतील. पवारांनी काय केले? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. गेल्या ५० वर्षात मी केलेल्या कामाचा लेखा-जोखा जनतेत जाऊन विचारा म्हणजे समजेल. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय आपण घेतले. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य निर्माण केले. महिलांना आरक्षण, विविध समाजांना आरक्षण, विद्यापिठांचे नामांतर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या कार्यकालात झाल्याचा विसर भाजपाला पडला असल्याची त्यांनी सांगितले. 

पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. तरीही सरकार सक्तीने त्यांची कर्जवसुली करीत आहे. त्यांच्या या अशा आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पीकच येत नाही. तिथं पीक कर्ज कसं भरणार. यासाठी आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. या सरकारने पाच वर्षात केवळ थापाच मारण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या किल्ल्यांना शौर्याचा इतिहास आहे. जिथे तलवारींचा खणखणाट झाला. तिथे आता हे सरकार दारूचे गुत्ते उघडायला निघाले आहे. नव्या पिढीला तुम्ही कोणता इतिहास शिकवणार असा प्रश्न विचारून नव्या पिढीचे भवितव्य या शासनाने अंधकारमय केले. ही नवी पिढीच आता सत्ता परिवर्तनासाठी सज्ज असल्याची पवारांनी सांगितले. शासन धमकावून व दडपशाहीने विविध नेत्यांवर दबाव आणत आहे. असा दबाव माझ्यावरही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फोल ठरला. 

शासन आता ३७० कलम हटविल्याचा गवगवा करत आहे. त्या भागाचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी हे कलम ठेवण्यात आले होते. हे कलम हटविल्यामुळे त्या भागात जाऊन शेती करण्याचा  अधिकार आला. मात्र, इथेच शेतीला लोक कंटाळलेत. ते काश्मीरमध्ये कशाला जातील? अशी टीका पवारांनी केली. अंबाजोगाई व परळी पंचताराकिंत वसाहत उभारून बेरोजगारांना न्याय देण्यासाठी मुंडे-साठे प्रयत्नशील राहतील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पवारांनी केले. यावेळी पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बबन लोमटे यांनी मानले. या सभेस महिला व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

मुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौनअंबाजोगाईत झालेल्या जाहिर सभेत शरद पवार मुंदडांच्या पक्षबदलावर काय भाष्य करणार. याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. पवारांच्या भाषणाअगोदर धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी यांनी मुंदडांच्या पक्षबदलावर कडाडून टिका केली. तसेच अक्षय मुंदडा यांच्या भाषणाची क्लिपही भरसभेत वाजवून दाखवली. मात्र, पवारांनी आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात मुंदडांचा साधा उल्लेखही केला नाही. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या पक्षबदलावर कडाडून तोफ डागणाऱ्या पवारांनी अंबाजोगाईत मुंदडांबद्दल बाळगलेल्या मौनामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसkaij-acकेजparli-acपरळीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019