शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:36 IST

Maharashtra Election 2019: पाच वर्षात हिताचे एकही काम नाही; कार्यकाळ केवळ आश्वासनातच घालवला

ठळक मुद्देसत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज सरकारला नव्या पिढीची चिंता नाही तरूण पिढीच सत्ता परिवर्तन करेलमुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौन 

अंबाजोगाई : भाजपा -सेना युतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ केवळ आश्वासनातच गेला. राज्याच्या हिताचे एकही काम झाले नाही. अशा सरकारला घरी पाठवून राज्यात परिवर्तन आणण्यासाठी  नव्या पिढीने ही निवडणूक हाती घेतली आहे. सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

केज  व परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे व आ. धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर  शरद पवार यांची सभा झाली. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, अंबाजोगाईच्या नगराध्यक्षा रचना मोदी, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, डॉ. नरेंद्र काळे, बाबुराव मुंडे, अनंतराव जगतकर, उल्हास पांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचे विजयी वातावरण दिसू लागल्याने पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना इथे येण्याची वेळ आली. मोदी व शहा यांची एकही सभा माझे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतकी धास्ती त्यांनी घेतली आहे. झोपेतही ते माझे नाव घ्यायला विसरत नसतील. पवारांनी काय केले? हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. गेल्या ५० वर्षात मी केलेल्या कामाचा लेखा-जोखा जनतेत जाऊन विचारा म्हणजे समजेल. महाराष्ट्राच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय आपण घेतले. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य निर्माण केले. महिलांना आरक्षण, विविध समाजांना आरक्षण, विद्यापिठांचे नामांतर, शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या कार्यकालात झाल्याचा विसर भाजपाला पडला असल्याची त्यांनी सांगितले. 

पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. तरीही सरकार सक्तीने त्यांची कर्जवसुली करीत आहे. त्यांच्या या अशा आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पीकच येत नाही. तिथं पीक कर्ज कसं भरणार. यासाठी आघाडी सरकार आल्यास शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. या सरकारने पाच वर्षात केवळ थापाच मारण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या किल्ल्यांना शौर्याचा इतिहास आहे. जिथे तलवारींचा खणखणाट झाला. तिथे आता हे सरकार दारूचे गुत्ते उघडायला निघाले आहे. नव्या पिढीला तुम्ही कोणता इतिहास शिकवणार असा प्रश्न विचारून नव्या पिढीचे भवितव्य या शासनाने अंधकारमय केले. ही नवी पिढीच आता सत्ता परिवर्तनासाठी सज्ज असल्याची पवारांनी सांगितले. शासन धमकावून व दडपशाहीने विविध नेत्यांवर दबाव आणत आहे. असा दबाव माझ्यावरही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फोल ठरला. 

शासन आता ३७० कलम हटविल्याचा गवगवा करत आहे. त्या भागाचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी हे कलम ठेवण्यात आले होते. हे कलम हटविल्यामुळे त्या भागात जाऊन शेती करण्याचा  अधिकार आला. मात्र, इथेच शेतीला लोक कंटाळलेत. ते काश्मीरमध्ये कशाला जातील? अशी टीका पवारांनी केली. अंबाजोगाई व परळी पंचताराकिंत वसाहत उभारून बेरोजगारांना न्याय देण्यासाठी मुंडे-साठे प्रयत्नशील राहतील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पवारांनी केले. यावेळी पंडितराव दौंड, धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, बजरंग सोनवणे, यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बबन लोमटे यांनी मानले. या सभेस महिला व मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

मुंदडांच्या पक्षबदलावर पवारांचे मौनअंबाजोगाईत झालेल्या जाहिर सभेत शरद पवार मुंदडांच्या पक्षबदलावर काय भाष्य करणार. याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. पवारांच्या भाषणाअगोदर धनंजय मुंडे, पृथ्वीराज साठे, बजरंग सोनवणे, राजकिशोर मोदी यांनी मुंदडांच्या पक्षबदलावर कडाडून टिका केली. तसेच अक्षय मुंदडा यांच्या भाषणाची क्लिपही भरसभेत वाजवून दाखवली. मात्र, पवारांनी आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात मुंदडांचा साधा उल्लेखही केला नाही. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या पक्षबदलावर कडाडून तोफ डागणाऱ्या पवारांनी अंबाजोगाईत मुंदडांबद्दल बाळगलेल्या मौनामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसkaij-acकेजparli-acपरळीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019