शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: 'ताईंना खोटं जमलं नाही...' पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 08:14 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले.

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा पराभव करत जायंट किलर ठरले. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली. परळीतून धनंजय मुंडे यांना 1,21,555 एवढी मतं मिळाली असून, पंकजा मुंडेंना 91,031 मतांवर समाधान मानावं लागलं. धनंजय मुंडेंनी जवळपास 30,524 मताधिक्यानं पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना अनाकलनीय असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्टही टाकली आहे. या पोस्टमध्ये पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्या लिहितात, मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे. असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेनही. आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी. राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच. तो अंतिम असतो बस्स!!, ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!, मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं "मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा". या राजकारणात मी यशस्वी होणं हाही पराभव आहे, असंही मला वाटत राहिलं. 19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच 21 तारखेला सकाळी बाहेर पडले.माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले. गोपीनाथ गड येथे मध्ये साहेबांचे दर्शन घेतले आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले. मला मतं मिळाली नसतीलही, मला मन जिंकताही आली नसतील, पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं नाही’हे शत्रूही कबूल करेल. या पोस्टच्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही, पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं...’, विश्वास ठेवा मी 'त्या 'क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हेही नक्की. इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो. मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला, मीडिया ही गेला होता. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे. त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं. मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे. निकालाची जबाबदारी फक्त माझी आहे, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळी