शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सोशलं मीडियातून प्रेम जुळले, बीडच्या अल्पवयीन मुलीला त्याने थेट पश्चिम बंगालला पळवून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 19:32 IST

तब्बल सहा महिन्यांनी मुलीने मोबाइल सुरू केला अन् लागला दोघांचा पत्ता

बीड : सोशल मीडियातून ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् फोनवरून बोलणे सुरू झाल्यानंतर ते दोघे एकमेकांत गुंतत गेले. अखेर त्याने एक दिवस पश्चिम बंगालहून बीडला येऊन अल्पवयीन मुलीला पळविले. सहा महिने ते रांची येथे एकत्रित राहिले. या जाेडप्याचा पेठ बीड पोलिसांनी अखेर छडा लावला. २६ रोजी त्या दोघांना घेऊन पोलीस बीडमध्ये पोहोचले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज रंजित भगत (३६, रा. उकरा, ता. आसामसोल, जि. दुर्गापूर, पश्चिम बंगाल) असे त्या आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलगी बीडमधील पेठ बीड ठाणे हद्दीतील असून, सहा महिन्यांपूर्वी स्टार मेकर नावाच्या ॲपवरून त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेऊन ते बाेलू लागले. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर एक दिवस त्यांनी पलायनाचे नियोजन केले. १४ जानेवारी २०२२ रोजी सूरज भगत बीडला आला. अल्पवयीन मुलीला घेऊन तो पश्चिम बंगालमध्ये पोहोचला. त्यानंतर ते दोघे रांचीत एका ठिकाणी खोली घेऊन राहिले. मजुरीकाम करून ते उदरनिर्वाह भागवत. 

इकडे मुलीच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेर त्यांनी १७ जानेवारी रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद केला. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड ठाण्याचे सहायक निरीक्षक केदार पालवे यांनी उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, हवालदार सुभाष मोटे व पोलीस नाईक सुनील अलगट यांना पश्चिम बंगालला रवाना केले.

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर न्यायालयात प्रवासी रिमांड घेऊन पथक बीडला पोहोचले. मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले. तिला बालगृहात ठेवण्यात आले. आरोपी सूरज भगत याला २७ मे रोजी न्यायालयात हजर केले असता ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अपहरण प्रकरणात ॲट्रॉसिटीचे कलम वाढले आहे.

सहा महिन्यांनी मोबाइल सुरू केला अन्....पेठ बीड ठाण्याच्या पोलिसांनी अपहृत मुलीच्या मोबाइलवरून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद असल्याने तिचे लोकेशन मिळत नव्हते. अखेर तब्बल सहा महिन्यांनी तिने मोबाइल सुरू केला. त्यानंतर २३ मे रोजी पश्चिम बंगालमधून त्या दोघांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे १८ मे रोजीच ते रांचीहून गावी पोहाेचले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडSocial Mediaसोशल मीडिया