शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Lok Sabha Election 2019 : सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर बीड पोलिसांकडून कारवायांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:38 IST

अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

बीड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावरून व्हायरल करणाऱ्यांवर बीड पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला आहे. अवघ्या १२ तासांत १० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून आणखी ५० च्यावर लोकांची यादी तयार केली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. या घटनेत अनेकांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्या. तसेच शुक्रवारी केज तालुक्यातील धर्माळा येथे लोकसभा निवडणुक उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याची खोटी अफवा पसरवली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सोशल मिडीयावरून टिका व अपशब्द वापरून खालच्या स्तराचे राजकारण झाले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सायबर सेलमध्ये विशेष विभाग स्थापन केला. ७०३०००८१०० या क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यासंदर्भात आवाहन केले. नाव गोपनिय ठेवण्याचा विश्वास दिला. त्यामुळे अवघ्या १२ तासांत तक्रारींचा ढिगारा साचला. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक रोशन पंडित स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी आलेल्या तक्रारींची शहानिशा केली. पोस्ट टाकणाऱ्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळविले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. 

पत्ता आणि संपर्क करताना दमछाकसोशल मिडीयावर पोस्ट टाकल्याचे दिसून येते. मात्र संबंधिताचा शोध घेऊन त्याच्याशी संपर्क करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे. विशेष टिम यासाठी काम करू लागली आहे. संपर्क करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

खोट्या बातम्या छापणाऱ्यांवरही नजरधर्माळा येथील घटनेत उमेदवाराच्या पत्नीवर कोयत्याने हल्ला झाल्याच्या बातम्या अनेकांनी प्रसिद्ध केल्या. मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असून यात कसलेही राजकीय कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. अनेक माध्यमांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वृत्त प्रकाशित केले. त्यांनाही पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटीस पाठविली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.

प्रतिबंधात्मक कारवाई सुरु आहे सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा ठरणाऱ्या पोस्टची खात्री करून प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांनी आणि माध्यमांनी खोट्या बातम्या व अफवा पसरवू नयेत. बीड पोलिसांना सहकार्य करावे.- विजय कबाडे, अपर  पोलीस अधीक्षक, बीड

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडSocial Mediaसोशल मीडिया