शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
3
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
4
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
5
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
6
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
7
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
8
आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
9
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
10
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
11
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
12
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
13
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
14
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
15
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
16
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
17
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
18
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
19
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
20
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेप्रमाणेच अचानक विधानसभेसाठी युतीची घोषणा होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:47 IST

महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते.

ठळक मुद्दे१५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता स्वत:शीच संवाद कृष्णाचे पाणी मराठवाड्यासाठी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात

बीड : लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होणार की नाही, अशी चर्चा होती; परंतु, युतीची अचानक घोषणा केली. यावेळीही त्याचप्रमाणे घोषणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.

येथील विश्रामगृहावर सकाळी झालेल्या या पत्रपरिषदेस पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांनी युतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या होत्या; परंतु आमची युती झाली. यावेळीही  तसेच होईल. युतीसाठी वातावरण पोषक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांच्या संदर्भात ते म्हणाले, १५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता ही मंडळी स्वत:शीच संवाद करीत राहिली. त्यामुळे जनतेने निवडणुकीत त्यांचा पर्दाफाश केला. आमच्या या महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. काँग्रेसची संवाद यात्रा तर मंगल कार्यालयातून सुरू झाली आणि त्यांच्या सभा छोट्या-छोट्या सभागृहातून होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल. विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, मेटे यांच्या भूमिकेवर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मी स्पष्ट बजावले होते. बीड जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही तुम्ही आमच्यासोबत प्रचार करू नका, असे तेव्हा त्यांना सांगितले होते. त्यांचे किती बळ होते, हेही आपण लोकसभा निवडणुकीत बघितले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यात दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पांतर्गत धरणे जोडण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी १० हजार ८०० कोटींच्या पहिल्या टप्प्यास सुरुवातही झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी १ हजार १७९ कि.मी.ची पाईप लाईन असलेल्या ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल. कोकणातून वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. यापैकी २५ टीएमसीच्या योजनेचा डीपीआरही तयार झाला आहे. कृष्णाचे पाणी मराठवाड्यासाठी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे आष्टी, पाटोदा परिसरास त्याचा फायदा होईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे