शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

लोकसभेप्रमाणेच अचानक विधानसभेसाठी युतीची घोषणा होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:47 IST

महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते.

ठळक मुद्दे१५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता स्वत:शीच संवाद कृष्णाचे पाणी मराठवाड्यासाठी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात

बीड : लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होणार की नाही, अशी चर्चा होती; परंतु, युतीची अचानक घोषणा केली. यावेळीही त्याचप्रमाणे घोषणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.

येथील विश्रामगृहावर सकाळी झालेल्या या पत्रपरिषदेस पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस, आ.भीमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, माध्यमांनी युतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या होत्या; परंतु आमची युती झाली. यावेळीही  तसेच होईल. युतीसाठी वातावरण पोषक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रांच्या संदर्भात ते म्हणाले, १५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता ही मंडळी स्वत:शीच संवाद करीत राहिली. त्यामुळे जनतेने निवडणुकीत त्यांचा पर्दाफाश केला. आमच्या या महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. काँग्रेसची संवाद यात्रा तर मंगल कार्यालयातून सुरू झाली आणि त्यांच्या सभा छोट्या-छोट्या सभागृहातून होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल. विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, मेटे यांच्या भूमिकेवर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच मी स्पष्ट बजावले होते. बीड जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रात कुठेही तुम्ही आमच्यासोबत प्रचार करू नका, असे तेव्हा त्यांना सांगितले होते. त्यांचे किती बळ होते, हेही आपण लोकसभा निवडणुकीत बघितले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

मराठवाड्यात दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पांतर्गत धरणे जोडण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी १० हजार ८०० कोटींच्या पहिल्या टप्प्यास सुरुवातही झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी १ हजार १७९ कि.मी.ची पाईप लाईन असलेल्या ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या योजनेस मान्यता दिली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल. कोकणातून वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. यापैकी २५ टीएमसीच्या योजनेचा डीपीआरही तयार झाला आहे. कृष्णाचे पाणी मराठवाड्यासाठी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यामुळे आष्टी, पाटोदा परिसरास त्याचा फायदा होईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे