शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:31 IST

शेतकर्‍यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

माजलगाव ( बीड ): शेतकर्‍यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

माजलगाव येथील बाजार समिती आवारातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मूग, सोयाबीन, उडीद मालाची विक्री केली आहे. हे शासकीय केंद्र खरेदी-विक्री संघाच्या वतीने चालविण्यात येत होते. या केंद्रावर ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ३१७ शेतकर्‍यांनी सोयाबीन ४ हजार ५९० क्विंटल, ३९१ शेतकर्‍यांनी उडीद २ हजार ९१८ क्विंटल तर ३०१ शेतकर्‍यांनी मूग १ हजार ८५३ क्विंटल घातला होता. ही संपूर्ण खरेदी प्रक्रि या आॅनलाईन नोंदणी पद्धतीने करण्यात आली होती.

यावेळी प्रत्येक शेतकर्‍यांना हेक्टरी ठराविक क्विंटलच माल घालण्याची अट ठेवण्यात आली होती. या पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या मालाची माहिती खरेदी-विक्री संघाने जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांकडे पाठविली. त्यांच्यामार्फत ही माहिती नाफेडला पाठविल्यानंतर नाफेडने याची शहानिशा करून खरेदी केलेल्या मालाचे पैसे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे पाठविले. त्यांनी तीच रक्कम खरेदी-विक्री संघाकडे पाठवली आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खात्यावर मालाचे पैसे पाठवताना त्याने विक्री केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम न टाकता ती कमी प्रमाणात टाकण्यात आली आहे. अनेकांच्या खात्यात विक्री केलेल्या मालाच्या कमी रक्कम जमा झाल्याने शेतकर्‍यात खळबळ उडाली आहे. याला खरेदी-विक्री संघाचा भोंगळ कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

कमी पैसे मिळाले खरेदी-केंद्रावर शासनाच्या नियमाप्रमाणे उडीद ३ क्विंटल ३६ किलो घातला होता, याचे एकूण पैसे १८ हजार १४४ रु पये येणे आवश्यक होते परंतु मला केवळ १३  हजार ४८० रुपयेच मिळाले आहेत. संबंधितांना मी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली.- पांडुरंग शिंदे, शेतकरी 

नियमापेक्षा जास्त माल शासनाने नेमून दिलेल्या नियमापेक्षा जास्त माल शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावर घातला होता. पडताळणीनंत तो अतिरिक्त माल परत आला असून लवकरच तो शेतकर्‍यांना परत करणार आहोत. यामुळे अनेक शेतकर्‍यांना कमी पैसे मिळाले आहेत.- अमोल पांडे, शाखाधिकारी, खरेदी-विक्र ी संघ 

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड