शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न ...

दिंद्रुड प्रतिनिधी : युवकांनी सोशल मीडिया सोडून उद्योगधंदे उभारणे काळाची गरज आहे. व्यवसायात यश-अपयश येत असते. मात्र, अपयशास न जुमानता जो उद्योगधंद्यामध्ये पुढे जातो तोच खरा उद्योजक असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले. ते दिंद्रुड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, सध्याचा तरुण सोशल मीडियाच्या आहारी जात आहे. कामधंदे सोडून अवास्तव जीवनात भरकटत आहे. तसे न करता युवकांनी दिसेल तो व्यवसाय न घाबरता करणे गरजेचे आहे. व्यवसायात बऱ्याच अडचणी येतात. मात्र, जो न खचता व्यवसायात पुढे जातो तोच खरा उद्योजक बनतो असेही ते म्हणाले.

यावेळी प्राध्यापक रमेश गटकळ, उद्योजक महालिंग अप्पा मिटकरी, ह.भ.प. उद्धव महाराज ठोंबरे, तेलगावचे सरपंच दीपक लगड, संगमचे सरपंच भगवानराव कांदे, दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार, व्हरकटवाडीचे सरपंच रामकिसन व्हरकटे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. लघु उद्योगासाठी शासनाच्या अनेक योजना असून उद्योजकांनी प्रयत्न केल्यास बँकेकडून कर्ज उपलब्ध करीत विविध व्यवसाय करता येतात. आपल्या प्रगतीसाठी बदलत्या काळाचा वेध घेत युवकांनी उद्योगधंदे उभारावेत, असे मत प्रा. डॉ. रमेश गटकळ यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सूत्रसंचालन बंडू खांडेकर यांनी केले. नागेश कानडे यांनी आभार मानले.