शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Manoj Jarange Patil: 'धनंजय मुंडेंना आमदारकीपासून दूर ठेवा, त्यांचीही चौकशी करा'; मनोज जरांगे पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:53 IST

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांना आमदारकीपासून दूर ठेवण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीड पोलिसांनी कोर्टात आरोप पत्र दाखल केले. यानंतर सोशल मीडियावर हत्येवेळी काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्यआरोपी असल्याचे म्हटले आहे. यानंतर राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. 

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली

आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले. 

जरांगे पाटील म्हणाले, बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होते का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"फरार आरोपीला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामा देईपर्यंतचे सर्व कॉल डिटेल्स समोर आले पाहिजेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. धनंजय मुंडे यांचा पुरवणी जबाब घेणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहजे. ३०२ मध्ये अटक केली पाहजे, असंही जरांगे म्हणाले.

पाणी भरणाऱ्याकडे एवढ्या गाड्या कुठून आल्या? 

"पाणी भरणाऱ्या जवळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत.बीएमडब्लू सारख्या गाड्या आहेत. हे कराड याचं नसावं हे मुंडे यांचं आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मुंडे यांनी कराड याचा बळी दिला. जेलमध्ये सडायची वेळ आली हे कराड याच्या कुटुंबाला देखील कळलं असेल. कराड याने कोर्टात सांगावं खून,खंडणी,गुंडगिरी हे सगळं मुंडे मुळे केलं असं सांगावं, जे खर आहे ते बोललं पाहजे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण