शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Manoj Jarange Patil: 'धनंजय मुंडेंना आमदारकीपासून दूर ठेवा, त्यांचीही चौकशी करा'; मनोज जरांगे पाटलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:53 IST

Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांना आमदारकीपासून दूर ठेवण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीड पोलिसांनी कोर्टात आरोप पत्र दाखल केले. यानंतर सोशल मीडियावर हत्येवेळी काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या आरोप पत्रात वाल्मीक कराड हा मुख्यआरोपी असल्याचे म्हटले आहे. यानंतर राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. 

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा! कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली

आज पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे असंही जरांगे पाटील म्हणाले. 

जरांगे पाटील म्हणाले, बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होते का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

"फरार आरोपीला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामा देईपर्यंतचे सर्व कॉल डिटेल्स समोर आले पाहिजेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. धनंजय मुंडे यांचा पुरवणी जबाब घेणं अत्यंत गरजेचं आहे.यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहजे. ३०२ मध्ये अटक केली पाहजे, असंही जरांगे म्हणाले.

पाणी भरणाऱ्याकडे एवढ्या गाड्या कुठून आल्या? 

"पाणी भरणाऱ्या जवळ एवढ्या मोठ्या गाड्या आहेत.बीएमडब्लू सारख्या गाड्या आहेत. हे कराड याचं नसावं हे मुंडे यांचं आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मुंडे यांनी कराड याचा बळी दिला. जेलमध्ये सडायची वेळ आली हे कराड याच्या कुटुंबाला देखील कळलं असेल. कराड याने कोर्टात सांगावं खून,खंडणी,गुंडगिरी हे सगळं मुंडे मुळे केलं असं सांगावं, जे खर आहे ते बोललं पाहजे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण