शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कारागृह नव्हे, कैद्यांचा कोंडवाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:07 IST

बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा कारागृहातील वास्तव : क्षमता १६१ ची अन् कैदी ३०० पेक्षा जास्त, विस्तारासह मनुष्यबळ वाढीची गरज

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. येथे आठ बरॅक असून १६१ कैद्यांची (१४४ पुरूष व १७ महिला) क्षमता आहे. मात्र, सद्यस्थितीत आणि नेहमीच या कारागृहात ३०० च्या वर किंवा जवळपास कैदी असतात. त्यामुळे एका बरॅकमध्ये अक्षरश: कैद्यांना कोंबून ठेवण्याची वेळ येत आहे.बरॅकची रूंदीही कमी असल्याने येथील कैद्यांना राहणे देखील जिखरिचे बनले आहे. त्यामुळे झोपणे, राहणे, बसणे, मनोरंजन करणे आदी किरकोळ गोष्टींवरून कैद्यांमध्ये वाद होत असल्याचेही अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. त्यामुळे कारागृहाला नवीन इमारत व बरॅक वाढविण्यासंदर्भात शासन स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.दरम्यान, गुरुवारी पहाटे बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.बीड : जिल्हा कारागृहातील धक्कादायक वास्तव गुरूवारी समोर आले आहे. येथील कारागृहात कैद्यांची क्षमता केवळ १६१ एवढी आहे, प्रत्यक्षात मात्र येथे रोज ३०० च्या वर कैदी रहात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे कारागृह नसून कैद्यांचा कोडवाडा बनले आहे. विशेष म्हणजे कैद्यांवर नजर आणि बंदोबस्तासाठी येथील मनुष्यबळही खुपच अपुरे असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकूणच जिल्हा कारागृह सध्या गंभीर समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे.कैदी वाढले, मनुष्यबळ मात्र तेवढेचकारागृहाची निर्मिती झाल्यापासून येथे १६१ कैद्यांना डोळ्यासमोर ठेवून ५३ अधिकारी, कर्मचारी नियूक्त केले. सद्यस्थितीत कैद्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र अधिकारी, कर्मचारी आहे तेवढेच आहेत.त्यामुळे त्यांच्यावर बंदोबस्तासह कामाचा ताण वाढत आहे. जबाबदारी वाढल्याने आणि काही दुर्घटना घडल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा सुट्टया देखील रद्द केल्या आहेत.डॉक्टरची केली मागणीकारागृहात केवळ औषधनिर्मात्याचे पद भरलेले आहे. डॉक्टर देण्यासंदर्भात महानिरीक्षकांकडे पत्र पाठवून मागणी केलेली आहे. मात्र अनेक वर्षे झाले तरी ते अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे एखाद्या कैद्याला किरकोळ आजार झाला तरी त्याला जिल्हा रूग्णालयात पाठवावे लागते. अनेकवेळा गंभीर आजार असलेल्या कैद्यावर तात्काळ उपचार होत नाहीत.इतर कारागृहात कैद्यांचे स्थलांतरकिरकोळ गुन्हा करून आलेले कैदी जास्त वाद घालत नाहीत. मात्र कुख्यात, सराईत गुन्हेगार हे नेहमीच इतर कैद्यांना त्रास देतात. अशावेळी त्यांना न्यायालय आणि महानिरीक्षकांच्या परवानगीने इतर कारागृहात पाठविले जाते.यापूर्वी कल्याण कारागृहातून आलेल्या एका दरोडेखोराने इतर कैद्यांना मारण्याची धमकी दिली होती. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतही वाद घातले होते.त्याला तात्काळ सेंट्रल कारागृहात पाठविले होते. साधारण दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती.कारागृह अधीक्षकांचे पद रिक्तअगोदरच अपुरे मनुष्यबळ. त्यात कारागृह अधीक्षकांसह तुरूंगाधिकारी या दोन अधिकाऱ्यांसह हवालदाराचे पद रिक्त आहे. सध्या एम.एस.पवार यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. संजय कांबळे हे निरीक्षक त्यांना सहकार्य करतात.

टॅग्स :BeedबीडjailतुरुंगBeed policeबीड पोलीस