शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 06:38 IST

ते ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणार, झेंडे उचलायलाही कोणी नसेल - मोदी

अण्णा नवथर/ अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर / अंबाजोगाई (जि.बीड) : ४ जूनला इंडिया आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ आहे. त्यानंतर त्यांचे झेंडे उचलायलाही कोणी राहणार नाही. एससी, एसटी, ओबीसी यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देण्याची भाषा करणारे इंडिया आघाडीवाले संविधान बदलू पाहत आहेत, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदनगर येथील जाहीर सभेत केला.

अंबाजोगाई येथील सभेत बोलताना ‘६० वर्षांपासून बंद मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला राज्य सरकारने मिशन मोडअंतर्गत विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सिंचन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २७ प्रकल्प निवडले असून, काही पूर्ण होत आहेत, तर काही प्रगतिपथावर आहे, असे मोदी म्हणाले.अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत मोदी म्हणाले, आम्ही देशातील लोकांना संतुष्ट करू पाहत आहोत. मात्र, विरोधी आघाडी तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. 

‘व्होट जिहाद’ की ‘रामराज्य’? एक निवडाखरगोन/धार (म.प्र.) : भारत इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचला आहे आणि ‘व्होट जिहाद’ किंवा ‘रामराज्य’ यापैकी एकाची निवड सध्याच्या लोकसभा निवडणुकीत जनतेला करायची आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभांत केले. 

वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून टीका nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रसंगी हेमंत करकरे यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्यानेच गोळी झाडली. हा अधिकारी आरएसएस समर्पित होता, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. nया प्रकरणावरून मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. ते म्हणाले, मुंबईवर २६/११चा हल्ला पाकिस्तानने केला. न्यायालयात ते सिद्ध झाले. मात्र, काँग्रेस नेत्याने कसाबची बाजू घेणारे खतरनाक वक्तव्य केले आहे. हा सर्व शहिदांचा अवमान आहे. 

त्यांनी रिबीन कापून भ्रष्टाचार केला, आम्ही संकटमुक्त करूबीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील सभेत मराठवाड्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दुष्काळाकडे लक्ष दिले नाही. केवळ रिबीन कापून भ्रष्टाचार केला. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील बळीराजा जलसंजीवनी योजना इंडिया आघाडीने रोखल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने मराठवाड्याच्या प्रश्नांची उपेक्षा केल्याचा आरोप मोदींनी केला. अंबाजोगाईच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांची, तर अहमदनगरच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भागवत कराड, मंत्री दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४