शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जायकवाडीचे पाणी डिग्रस, पोहनेर येथे आल्याने आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:07 IST

जायकवाडी धरणाचे पाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे.

परळी/सिरसाळा : जायकवाडी धरणाचेपाणी गुरु वारी सकाळी डिग्रस, पोहनेर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहचले आहे. २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते. आता पात्रात पाणी येणे सुरू झाल्याने शेतकरी आनंदित होत आहे.तालुक्यातील डिग्रस, पोहनेर, तेलसमुख, बोरखेड या चार गावातून गोदावरी नदी जाते. पैठण येथील जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी आज सकाळी ६.४५ वाजता परळी तालुक्यातील डिग्रस या गावी पोहचले आहे. यानंतर पोहनेरला दुपारी पाणी आले. तेलसमुख व बोरखेड या गावातून सोनपेठ तालुक्यातील विटा व गंगाखेडवरून नांदेडला जाते. यामुळे परळी, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या गावांचा आणि परिसरातील १५ ते २० गावांतील शेतीसाठीचा आणि पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. मागील २ वर्षांपासून गोदावरी नदीचे पात्र कोरडे होते.गोदावरी नदी वरील बंधारा अपूर्ण ेतालुक्यातील पोहनेर येथील गोदावरीवरील बंधारा १५ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याचे संपूर्ण काम झालेले नाही. वास्तविक पाहता नाशिक ते तेलंगणा बॉर्डरपर्यंत गोदावरीच्या पात्रात एकूण छोटे सरासरी १५ ते २० बंधारे २२००५ साली मंजूर करण्यात आले होते. त्यातील पोहनेर/तारगव्हाण हा एकमेव बंधारा अपुर्ण आहे.हा बंधारा झाला असता तर १५ हजार हेक्टरच्यावर जमीन सिंचनाखाली आली असती आणि ढालेगाव -पोहनेर २० किमी पाणी गोदावरीमध्ये अडले असते. पात्राच्या दोन्ही बाजूचे गाव मिळून परिसरातील ५० ते ६० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता, परंतु पाणी पोहनेरला येऊनही पुढे वाहून जाणार आहे, अशी कैफियत पोहनेरचे अ‍ॅड. रमेश साखरे यांनी मांडली. निधी नसल्याने हे काम अपूर्ण असल्याचे हिवरा गावचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण