शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जय महेश साखर कारखान्याने केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:26 IST

कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देव्याजासह २०५० रुपये देण्याची मागणी : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याकडे उसाचे पैसे देताना सुरुवातीला काही शेतक-यांना २०५० रुपये प्रतीटन प्रमाणे देयके अदा केली होती. मात्र त्यानंतर अनेक शेतक-यांची उसाची देयके १८०० रुपये प्रतीटनाप्रमाणे देण्यात आली होती, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतीवर आधारित असणाºया मजूर व शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तसेच मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे माजलगाव, गेवराई, बीड, यासह इतर सर्व तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले होते. ते पूर्णपणे गाळप देखील करण्यात आले होते. मात्र गाळप केलेल्या उसाची देयके जय महेश साखर कारखान्याकडून काही शेतकºयांना २०५० रुपये प्रमाणे दिले होते. तर काही शेतकºयांना १८०० प्रमाणे दिले होते. त्यामुळे ज्या शेतकºयांना वाढीव भाव दिला नाही, त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे या मागणीसाठी मागील ११ महिन्यांपासून शेतकरीआंदोलन करत आहेत. मात्र कारखान्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.साखर कायदा १९६६ नुसार कारखान्याचा गाळप झाल्यापासून १५ दिवसांनी शेतकºयांचे पैसे देणे अनिवार्य आहे. हा कायदा मोडीत काढत कारखानदारांनी जवळपास वर्षभरापासून शेतकºयांचे पैसे थकवलेले आहेत. त्यामुळे कारखान्याने कायद्याप्रमाणे उर्वरित २५० रुपये प्रती टनाप्रमाणे पैसे खात्यावर व्याजासह जमा करावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके पाटील, पं.स.सदस्य पूजा मोरे, राजेंद्र होके पाटील, धनंजय मुळे, वचिष्ठ बेडके, रोहिदास चव्हाण यांच्यासह गेवराई, माजलगाव, वडवणी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला होता.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन