शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जय महेश साखर कारखान्याने केली दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:26 IST

कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देव्याजासह २०५० रुपये देण्याची मागणी : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याकडे उसाचे पैसे देताना सुरुवातीला काही शेतक-यांना २०५० रुपये प्रतीटन प्रमाणे देयके अदा केली होती. मात्र त्यानंतर अनेक शेतक-यांची उसाची देयके १८०० रुपये प्रतीटनाप्रमाणे देण्यात आली होती, त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कारखान्याने शेतक-यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप करत व्याजासह देयके देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळे शेतीवर आधारित असणाºया मजूर व शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तसेच मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे माजलगाव, गेवराई, बीड, यासह इतर सर्व तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले होते. ते पूर्णपणे गाळप देखील करण्यात आले होते. मात्र गाळप केलेल्या उसाची देयके जय महेश साखर कारखान्याकडून काही शेतकºयांना २०५० रुपये प्रमाणे दिले होते. तर काही शेतकºयांना १८०० प्रमाणे दिले होते. त्यामुळे ज्या शेतकºयांना वाढीव भाव दिला नाही, त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे या मागणीसाठी मागील ११ महिन्यांपासून शेतकरीआंदोलन करत आहेत. मात्र कारखान्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.साखर कायदा १९६६ नुसार कारखान्याचा गाळप झाल्यापासून १५ दिवसांनी शेतकºयांचे पैसे देणे अनिवार्य आहे. हा कायदा मोडीत काढत कारखानदारांनी जवळपास वर्षभरापासून शेतकºयांचे पैसे थकवलेले आहेत. त्यामुळे कारखान्याने कायद्याप्रमाणे उर्वरित २५० रुपये प्रती टनाप्रमाणे पैसे खात्यावर व्याजासह जमा करावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके पाटील, पं.स.सदस्य पूजा मोरे, राजेंद्र होके पाटील, धनंजय मुळे, वचिष्ठ बेडके, रोहिदास चव्हाण यांच्यासह गेवराई, माजलगाव, वडवणी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला होता.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagitationआंदोलन