शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:42 IST

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

ठळक मुद्देयंदा निसर्गाने साथ दिली, तर माणसाने दिला धोका बायकोच्या अंगावरील गंठण विकून केली होती पेरणी

- अमोल जाधव 

नांदुरघाट (जि.बीड) : यंदा निसर्गाने साथ दिली. मात्र, माणसानेच धोका दिला. बायकोचे गंठण विकून सोयाबीन पेरले होते. चांगला पाऊस होऊनही ते उगवले नाही. त्यामुळे जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले म्हणून स्वत:ला पेटविण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत फक्राबाद येथील शेतकरी लालासाहेब तांदळे यांनी आपली व्यथा मांडली.

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या. लालासाहेब दादाराव तांदळे (७०) हे  फक्राबाद (ता. वाशी, जि.उस्मानाबाद) येथील रहिवासी. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे गाव. गावची बाजारपेठ नांदुरघाट. बहुतांश व्यवहार बीड जिल्ह्यातच होतात. लालासाहेब यांना २ एकर २७ गुंठे जमीन. एवढ्याच जमिनीवर ७ माणसे उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासह पत्नी, एकुलता एक मुलगा वचिष्ट, त्याची पत्नी, २ नाती, १ नात असे सात माणसांचे कुटुंब. मुलगा शेतीच राबतो, तर सून मजूरीने जाते. पैसा नसल्याने बायकोच्या गळ्यातील गंठण आणि कानातले झुंबर विकून संपूर्ण जमिनीत सोयाबीन पेरले होते. सात दिवसांनी पाहिले तर बियाणे उगवलेच नाही. फक्त २० टक्के बियाणे उगवले. आता दुबार पेरणीसाठी कुठून पैसे आणायचे? कोणी उसनवारी देईना. घरात मोडायला दागिना नाही. शासन, कंपनी, दुकानदार दुबार पेरण्यासाठी बियाणे देईना. यामुळे मनाने खचलेल्या व नैराश्य आलेल्या लालासाहेब यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबायचा ठरवला. शेतात आत्महत्या करून उपयोग काय, म्हणून दहा लिटर डिझेल घेऊन दुकानासमोरच जीव देण्याचा निर्णय घेतला. यात दुकानदाराचा दोष नाही, परंतु कंपनीला कोठे शेधायचे? २८ जून रोजी दुकानासमोर अंगावर डिझेल टाकून घेतले आणि काडी पेटवणार तोच काही लोकांनी पळत येऊन काडीपेटी काढून घेतली आणि अंगावर पाणी टाकले... जीवंत राहिल्याचा आनंद मानायचा की मेलो नाही याचे दु:ख, हा लालासाहेब यांचा प्रश्न. एवढे झाल्यावरही मनातील काहूर कमी होईना. माझ्यापुढे दोनच पर्याय होते, एक तर बियाणे मिळविणे किंवा मृत्यूला कवटाळणे. बियाणाचे आश्वासन एकाने दिल्याने जगण्यासाठी पुन्हा बळ एकटवले...मग शेतकऱ्याने काय करायचे?लालासाहेब सांगत होते, ‘घरामध्ये आम्ही दोघेही नवरा-बायको आजारी. गाठ आली म्हणून बार्शी येथील दवाखान्यात १४ महिने अ‍ॅडमिट होतो.  चार महिन्यांपूर्वी बायकोचा हात मोडला. तिला काहीच करता येत नाही. ती दम्याने बेजार असते. दोघेही उतारवयात पूर्ण खचून गेलो आहोत. घरात खाणारी सात तोंडे एकटा पोरगा काय करणार?  माझ्यासारख्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था हीच आहे. मागे कर्जमाफी मिळाली. त्यामुळे मनावरील ताण कमी झाला होता. आता नवी उमेद आली होती. कष्ट करून जगत होतो. पण, सोयाबीन न उगवल्याने पुन्हा मोठा खड्डा पडला. अशावेळी शेतकऱ्याची मन:स्थिती ढासळते व तो मृत्यूला जवळ करतो. तुम्हीच सांगा, त्याच्याजवळ दुसरा कुठला मार्ग असतो, हा लालासाहेब यांचा प्रश्न. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड