शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:42 IST

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

ठळक मुद्देयंदा निसर्गाने साथ दिली, तर माणसाने दिला धोका बायकोच्या अंगावरील गंठण विकून केली होती पेरणी

- अमोल जाधव 

नांदुरघाट (जि.बीड) : यंदा निसर्गाने साथ दिली. मात्र, माणसानेच धोका दिला. बायकोचे गंठण विकून सोयाबीन पेरले होते. चांगला पाऊस होऊनही ते उगवले नाही. त्यामुळे जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले म्हणून स्वत:ला पेटविण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत फक्राबाद येथील शेतकरी लालासाहेब तांदळे यांनी आपली व्यथा मांडली.

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या. लालासाहेब दादाराव तांदळे (७०) हे  फक्राबाद (ता. वाशी, जि.उस्मानाबाद) येथील रहिवासी. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे गाव. गावची बाजारपेठ नांदुरघाट. बहुतांश व्यवहार बीड जिल्ह्यातच होतात. लालासाहेब यांना २ एकर २७ गुंठे जमीन. एवढ्याच जमिनीवर ७ माणसे उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासह पत्नी, एकुलता एक मुलगा वचिष्ट, त्याची पत्नी, २ नाती, १ नात असे सात माणसांचे कुटुंब. मुलगा शेतीच राबतो, तर सून मजूरीने जाते. पैसा नसल्याने बायकोच्या गळ्यातील गंठण आणि कानातले झुंबर विकून संपूर्ण जमिनीत सोयाबीन पेरले होते. सात दिवसांनी पाहिले तर बियाणे उगवलेच नाही. फक्त २० टक्के बियाणे उगवले. आता दुबार पेरणीसाठी कुठून पैसे आणायचे? कोणी उसनवारी देईना. घरात मोडायला दागिना नाही. शासन, कंपनी, दुकानदार दुबार पेरण्यासाठी बियाणे देईना. यामुळे मनाने खचलेल्या व नैराश्य आलेल्या लालासाहेब यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबायचा ठरवला. शेतात आत्महत्या करून उपयोग काय, म्हणून दहा लिटर डिझेल घेऊन दुकानासमोरच जीव देण्याचा निर्णय घेतला. यात दुकानदाराचा दोष नाही, परंतु कंपनीला कोठे शेधायचे? २८ जून रोजी दुकानासमोर अंगावर डिझेल टाकून घेतले आणि काडी पेटवणार तोच काही लोकांनी पळत येऊन काडीपेटी काढून घेतली आणि अंगावर पाणी टाकले... जीवंत राहिल्याचा आनंद मानायचा की मेलो नाही याचे दु:ख, हा लालासाहेब यांचा प्रश्न. एवढे झाल्यावरही मनातील काहूर कमी होईना. माझ्यापुढे दोनच पर्याय होते, एक तर बियाणे मिळविणे किंवा मृत्यूला कवटाळणे. बियाणाचे आश्वासन एकाने दिल्याने जगण्यासाठी पुन्हा बळ एकटवले...मग शेतकऱ्याने काय करायचे?लालासाहेब सांगत होते, ‘घरामध्ये आम्ही दोघेही नवरा-बायको आजारी. गाठ आली म्हणून बार्शी येथील दवाखान्यात १४ महिने अ‍ॅडमिट होतो.  चार महिन्यांपूर्वी बायकोचा हात मोडला. तिला काहीच करता येत नाही. ती दम्याने बेजार असते. दोघेही उतारवयात पूर्ण खचून गेलो आहोत. घरात खाणारी सात तोंडे एकटा पोरगा काय करणार?  माझ्यासारख्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था हीच आहे. मागे कर्जमाफी मिळाली. त्यामुळे मनावरील ताण कमी झाला होता. आता नवी उमेद आली होती. कष्ट करून जगत होतो. पण, सोयाबीन न उगवल्याने पुन्हा मोठा खड्डा पडला. अशावेळी शेतकऱ्याची मन:स्थिती ढासळते व तो मृत्यूला जवळ करतो. तुम्हीच सांगा, त्याच्याजवळ दुसरा कुठला मार्ग असतो, हा लालासाहेब यांचा प्रश्न. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड