शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...' धाय मोकलून रडली शेतकऱ्याची माय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 13:01 IST

उखंडा पिठ्ठीच्या पार्वती कदम धाय मोकलून रडल्या : अवकाळी फटक्यानंतर शेतकऱ्यांचे सावरणे सुरु

अनिल भंडारी

बीड : ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना. पसाभर रानात आलं नाही तर लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरायची नाय’ अशी कैफियत मांडताना उखंडा पिठ्ठी भागातील पार्वती कदम धाय मोकलून रडत होत्या.. आणि ते पाहून आम्हीही स्तब्ध झालो.  ‘उन पडायलंय वाळंन सगळं’ असा धीर देत होतो. तोच कर फुटलेली बाजरीची कणसं दाखवत ‘काय वाळंन, सगळंच उगून आलंय बघा’ असे सांगताना पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते. 

 मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या बाजरीची कणसं रस्त्यावरच कडेला वाळू घालत पार्वती आणि पती मारुती कदम हे चिंतातुर जोडपे दिसले. हातात पीक विम्याची कागदं होती.  पार्वतीला तीन मुले. या कुटुंबाला अवघी ४- ५ एकर जमीन. पावसामुळे झालेल्या नुकसानीची खबर भेटल्याने पुण्याला असणारा एक मुलगा आश्रुबा येऊन गेला होता. दुसरा मुलगा सोमनाथ वाहन चालक होता. ब्लड कॅन्सर झाल्याने १९९९ मध्ये वारला तर तिसरा परमेश्वर हा वाशी (जि. उस्मानाबाद) येथे हमालीचे काम करत होता. २००४ मध्ये भिंत पडून मृत्यू झाल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही पीक नुकसानीच्या पंचनाम्याला आलोत, असे वाटल्याने निसर्गाने मांडलेला खेळ त्या कथन करीत होत्या.निसर्गाने पिकांवर वरवंटा फिरविला तरी जगण्याची उर्मी त्यांच्या मनात मात्र जाणवत होती. 

धरणीला ओझं झालं पण बुचाड शाबूत राहिलं नाहीउखंडा पिठ्ठीत पोहचल्यावर एका झोपडीवजा हॉटेलवर तुकाराम भोंडवे, लक्ष्मण ठोसर भेटले. शंभर ते सव्वाशे शेतकरी असलेल्या साधरणत: दीड हजार लोकसंख्येचं हे गाव. तुकाराम बोलत होते, धरणीला ओझं झालं? काय त्याचं करावं. शेतात एखादं तरी बुचाड शाबूत राहिलं का? कर आले. पसरी वापल्या, खोबड्या वापल्या. सोयाबीन भिजून कर फुटलं तसंच वावरात राहिलं. वावरात पाणीच पाणी. पाणी कुठून आलं, कुठं गेलं याचा मेळच लागला नाही. यंदा पाऊस बरा झाला होता. पिकेही चांगली होती पण..पुढे त्यांना शब्दच सुचत नव्हते. 

६० वर्षात असा ‘बदमाशा’ पाऊस नव्हतानांगरणी, पाळी, मोगडा असा ४-५ हजार रुपये तर तीन पिशवयाला १० हजार खर्च केले. पिकही जोमात आलं, पण पावसाने शेत चेंवदाड झालं. वाळनं पण शेतात पडलेलं घ्यायला कुणी येईना. कवा पाणी आटन, कधी कापूस वेचावा, कधी कटकट मिटंल. आधीही पाऊस होता. पण एवढं नुकसान केलं नव्हतं. ६० वर्षात असा बदमाशा पाऊस नव्हता बघा. सरकारचं आपलं तर जमतच नाही, असं म्हणाताना सरकारी मदतीबद्दल लक्ष्मणरावांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार