शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

'असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...' धाय मोकलून रडली शेतकऱ्याची माय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 13:01 IST

उखंडा पिठ्ठीच्या पार्वती कदम धाय मोकलून रडल्या : अवकाळी फटक्यानंतर शेतकऱ्यांचे सावरणे सुरु

अनिल भंडारी

बीड : ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना. पसाभर रानात आलं नाही तर लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरायची नाय’ अशी कैफियत मांडताना उखंडा पिठ्ठी भागातील पार्वती कदम धाय मोकलून रडत होत्या.. आणि ते पाहून आम्हीही स्तब्ध झालो.  ‘उन पडायलंय वाळंन सगळं’ असा धीर देत होतो. तोच कर फुटलेली बाजरीची कणसं दाखवत ‘काय वाळंन, सगळंच उगून आलंय बघा’ असे सांगताना पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते. 

 मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या बाजरीची कणसं रस्त्यावरच कडेला वाळू घालत पार्वती आणि पती मारुती कदम हे चिंतातुर जोडपे दिसले. हातात पीक विम्याची कागदं होती.  पार्वतीला तीन मुले. या कुटुंबाला अवघी ४- ५ एकर जमीन. पावसामुळे झालेल्या नुकसानीची खबर भेटल्याने पुण्याला असणारा एक मुलगा आश्रुबा येऊन गेला होता. दुसरा मुलगा सोमनाथ वाहन चालक होता. ब्लड कॅन्सर झाल्याने १९९९ मध्ये वारला तर तिसरा परमेश्वर हा वाशी (जि. उस्मानाबाद) येथे हमालीचे काम करत होता. २००४ मध्ये भिंत पडून मृत्यू झाल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही पीक नुकसानीच्या पंचनाम्याला आलोत, असे वाटल्याने निसर्गाने मांडलेला खेळ त्या कथन करीत होत्या.निसर्गाने पिकांवर वरवंटा फिरविला तरी जगण्याची उर्मी त्यांच्या मनात मात्र जाणवत होती. 

धरणीला ओझं झालं पण बुचाड शाबूत राहिलं नाहीउखंडा पिठ्ठीत पोहचल्यावर एका झोपडीवजा हॉटेलवर तुकाराम भोंडवे, लक्ष्मण ठोसर भेटले. शंभर ते सव्वाशे शेतकरी असलेल्या साधरणत: दीड हजार लोकसंख्येचं हे गाव. तुकाराम बोलत होते, धरणीला ओझं झालं? काय त्याचं करावं. शेतात एखादं तरी बुचाड शाबूत राहिलं का? कर आले. पसरी वापल्या, खोबड्या वापल्या. सोयाबीन भिजून कर फुटलं तसंच वावरात राहिलं. वावरात पाणीच पाणी. पाणी कुठून आलं, कुठं गेलं याचा मेळच लागला नाही. यंदा पाऊस बरा झाला होता. पिकेही चांगली होती पण..पुढे त्यांना शब्दच सुचत नव्हते. 

६० वर्षात असा ‘बदमाशा’ पाऊस नव्हतानांगरणी, पाळी, मोगडा असा ४-५ हजार रुपये तर तीन पिशवयाला १० हजार खर्च केले. पिकही जोमात आलं, पण पावसाने शेत चेंवदाड झालं. वाळनं पण शेतात पडलेलं घ्यायला कुणी येईना. कवा पाणी आटन, कधी कापूस वेचावा, कधी कटकट मिटंल. आधीही पाऊस होता. पण एवढं नुकसान केलं नव्हतं. ६० वर्षात असा बदमाशा पाऊस नव्हता बघा. सरकारचं आपलं तर जमतच नाही, असं म्हणाताना सरकारी मदतीबद्दल लक्ष्मणरावांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकार