शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका

By शिरीष शिंदे | Updated: August 26, 2025 16:16 IST

आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र

बीड : राज्य सरकारने चालू खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचा मोठा आर्थिक फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात सहभागी होण्यास विमा कंपनीने स्पष्ट नकार दिला आहे. आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तहसील प्रशासनाला दिले आहे.

विमा कंपनीने फिरवली पाठकाही दिवसांपूर्वी गेवराईच्या तहसीलदारांनी, एनडीआरएफच्या निकषांनुसार होणाऱ्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात विमा कंपनीने सहभागी व्हावे, यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला पत्र दिले होते. यावर उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे सह-निरीक्षण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यापुरती आहे. एनडीआरएफच्या द्वारे आयोजित नुकसान मूल्यांकन सर्वेक्षणात आमचा सहभाग योजनेच्या कक्षेबाहेर आहे.’ कंपनीच्या या भूमिकेमुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणाचा आधार घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.

निकष का बदलले?२०२२ पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्याचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरत होते. मात्र, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, या बदलांची व्यापक माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसानएकीकडे विमा कंपनीने हात वर केले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आहेत. पंचनाम्यानंतरच नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित गावे ४९ असून नुकसानग्रस्त शेतकरी ३,४०७ आहेत. जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार २,०४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पुराच्या पाण्यामुळे २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :RainपाऊसCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड