शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका

By शिरीष शिंदे | Updated: August 26, 2025 16:16 IST

आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र

बीड : राज्य सरकारने चालू खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचा मोठा आर्थिक फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात सहभागी होण्यास विमा कंपनीने स्पष्ट नकार दिला आहे. आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तहसील प्रशासनाला दिले आहे.

विमा कंपनीने फिरवली पाठकाही दिवसांपूर्वी गेवराईच्या तहसीलदारांनी, एनडीआरएफच्या निकषांनुसार होणाऱ्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात विमा कंपनीने सहभागी व्हावे, यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला पत्र दिले होते. यावर उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे सह-निरीक्षण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यापुरती आहे. एनडीआरएफच्या द्वारे आयोजित नुकसान मूल्यांकन सर्वेक्षणात आमचा सहभाग योजनेच्या कक्षेबाहेर आहे.’ कंपनीच्या या भूमिकेमुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणाचा आधार घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.

निकष का बदलले?२०२२ पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्याचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरत होते. मात्र, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, या बदलांची व्यापक माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसानएकीकडे विमा कंपनीने हात वर केले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आहेत. पंचनाम्यानंतरच नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित गावे ४९ असून नुकसानग्रस्त शेतकरी ३,४०७ आहेत. जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार २,०४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पुराच्या पाण्यामुळे २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :RainपाऊसCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड