शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:15 IST

सोमवारी अचानक विभागीय आयुक्त कार्यालयातील २० अधिकाऱ्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांची तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांची ९ मे रोजी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वतीने अचानक तपासणी झाली होती. यावेळी काही चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. यामध्ये काही छावण्यांवर कारवाई देखील झाली आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर सोमवारी अचानक विभागीय आयुक्त कार्यालयातील २० अधिकाऱ्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांची तपासणी केली. तपासणी होणार असल्याची माहिती जिल्ह्यातील अधिका-यांना देखील दिली नव्हती.दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात ६०० चारा छावण्या सुरू केल्या आहेत. गत दोन महिन्यांपासून छावण्या कार्यरत असून, जिल्ह्यातील ४ लाख २१ हजारापेक्षा अधिक जनावरे आस-याला आहेत. काही चारा छावण्यात जनावरांची संख्या अधिक दाखवली जात आहे. चारा, पशुखाद्य व शुद्ध पाणी पुरेसे दिले जात नाही, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ९ मे रोजी कार्यक्षेत्राबाहेरील उपविभागीय अधिका-यांच्या वतीने पडताळणी करण्यासाठी अचानक छावण्यांची तपासणी झाली होती. यावेळी प्रामुख्याने बीड व आष्टी तालुक्यातील छावण्या तपासण्यात आल्या होत्या. यावेळी काही छावण्यांमध्ये ५०० ते १५०० जनावरे कमी आढळून आले होते. याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई करीत कोल्हारवाडी येथील छावणी रद्द केली होती. त्यानंतर छावण्यांमध्ये गैरप्रकार असल्याचे उघड झाले होते. या कारवाईनंतर भीतीपोटी ७ आणि १० तारखेच्या अहवालामध्ये जनावरांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. बीड जिल्ह्यात साडेसतरा हजार जनावरे प्रत्येक दिवशी जास्त दाखवली जात असल्याचे उघड झाले होते. यात बीड तालुक्यात १६ हजार जनावरे जास्त होती. ही जास्तीची जनावरे दाखवून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावण्याचे काम काही छावणी चालकांकडून केले जात असल्याचे देखील निदर्शनास आले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर आयुक्त व उपायुक्त यासह इतर २० अधिका-यांच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील छावण्यांची अचानक तपासणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात देखील छावण्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे ही तपासणी केली असून, याचा अहवाल १४ मे रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिला जाणार आहे. हा अहवाल गुलदस्त्यात असून, विभागीय आयुक्त केंद्रेकर काय कार्यवाही करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.या अधिका-यांनी केली तपासणीअपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, अपर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकूर, प्रकाश खपले, स्वप्नील मोरे, तुकाराम मोटे यांच्या पथकाने आष्टी तालुक्यातील ७ मंडळांमधील चारा छावण्यांची तपासणी केली.उपायुक्त पारस बोथरा, अपर जिल्हाधिकारी औरंगाबाद भानुदास पालवे, ज्ञानोबा बनापुरे, डॉ.डी.एस. कांबळे, साहेबराव दिवेगावकर, डॉ.भिकसिंग राजपूत यांच्या पथकाने बीड तालुक्यातील ६ मंडळांमधील २४ छावण्यांची तपासणी केली.उपायुक्त र.वि. जगताप, अशोक शिरसे, सुनील राऊतमारे, वर्षाराणी भोसले यांच्या पथकाने पाटोदा तालुक्यातील ४ महसुली मंडळांतील १४ चारा छावण्यांची तपासणी केली.प्रतापसिंह कदम, रिता मेत्रेवार, डॉ. भारत कदम यांच्या पथकाने शिरुर कासार तालुक्यातील ३ महसुली मंडळांतील ९ चारा छावण्या तपासल्या.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयdroughtदुष्काळFarmerशेतकरी