शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दहशत असती तर, एवढ्या महिला आल्या असत्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:44 IST

दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देराजश्री मुंडे यांचा सवाल : नणंदेवर केली टीका

परळी : परळीमध्ये कसली आली आहे दहशत? धनंजय मुंडे या तुमच्या भावाचे सुरक्षा कवच असल्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दहशत असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला या मेळाव्याला आल्या असत्या का ? असा सवाल करीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे म्हणाल्या, साहेबांनी दीड हजाराच्या जवळपास मुलींचे कन्यादान करायचं काम केलं. आपण एकदा परिवर्तन करा अन् त्यांना निवडून द्या, असे आवाहन राजश्री मुंडे यांनी केले.धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ शहरातील हालगे गार्डन येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मला माझ्या मुली म्हणाल्या की, आई, बाबा इथल्या नागरिकांसाठी खूप काही करतात. २४-२४ तास नागरिकांमध्ये असतात. तू एक पाऊल पुढं टाक अन महिलांसाठी काम कर. त्यानंतर मी आता हे काम सुरू केलं आहे. इतिहास साक्षी आहे. एकदा महिलांनी परिवर्तनाची लढाई हातात घेतली की, परिवर्तन अटळ आहे आणि ते आम्ही करणार असे राजश्री मुंडे म्हणाल्या.सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कामधनंजय मुंडेनी विकासाचं राजकारण केलं आहे. तुमचे भाऊ सरकारला भांडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतात. पीकविमा, वैद्यनाथचे बिल हे आंदोलन करून मिळवून दिले आहेत. दोनदा आमदार, दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या तरी दुष्काळात परळीकरांना पाण्याचा एक हंडा देखील दिला नाही. ज्या वैद्यनाथ कारखान्याचे नाव आशिया खंडात होतं तो वैद्यनाथ कारखाना बंद पाडण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं आहे असा घणाघात करत भावजई राजश्री धनंजय मुंडे यांनी नणंद पंकजा मुंडेंसह प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे