शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 15:00 IST

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता.

ठळक मुद्दे एका पावसा अभावी शेतकरी कंगाल  तुरीच्या तुऱ्हाट्या आणि कापसाचे झाले खराटे

शिरुर कासार (बीड ) : आतापर्यत कधी अनुभवले नाही आणि ऐकलेही नाही असा प्रसंग तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता. मात्र, तसे न होता शेतकरी पुरता नागवला गेला. पिके गेली, चारा नाही आणि पाणीही नाही अशा उजाड झालेल्या वाळवंटात गुजराण कशी करायची याची भ्रांत. सुखाची झोप येऊ देईना, सरकार मायबाप काय दिलासा देतय यावर सारं आता अवलंबून आहे.

साखर आणि गूळ पिकवणारा तालुका आता पाण्याअभावी पांढऱ्या सोन्याकडे झुकला होता. गेल्या काही वर्षांपासून कापूस आधारभूत मानला जायचा पण त्यालाही आता उतरणी सुरु झाली आणि यावर्षी तर खर्च करुन शेतकरी फक्त तुरीच्या तुराट्या आणि कापसाच्या खराट्याचा मालक बनला. झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यापोटी अब्जाधिश होऊ पहात असलेला शेतकरी हातात कटोरी घेऊन सरकारकडे मदतीची याचना करु लागलाय. बळीराजाच बलहीन झाल्याने विकासाचा कणाच मोडू पहातोय.

तालूक्याचे भौगोलिक क्षेत्र ६५०१८.४ हेक्टर असून, त्यात पेरणी क्षेत्र ५५३३९.६ हेक्टर आहे. या वर्षी खरीपात २७४३१ हेक्टरवर कापूस लागवड केली होती. उगवणीत व पुढे मशागतीच्या जोरावर चित्र चांगले दिसत होते. कापूस उत्पादनाचा अंदाज बांधत बिचारा शेतकरी संध्याकाळी चतकोर भाकरी जास्त खात होता. मात्र, हे सारे मृगजळ ठरले आणि पावसाने होत्याचे नव्हते केले. हेक्टरी किमान १५ ते ३० क्विंटल उतारा होणारा कापसाचा काटा २ ते ३ क्विंटलवर अडकला आणि कापसाचा शेवट झाला. आता आहे तो भाव जरी अपेक्षित उत्पन्न होऊन मिळाले असते तरी शेतकऱ्याचे हात सोन्यासारखे पिवळे झाले असते. त्याच्या हाताला कोळशाच रंग लागला गेला.

कापसासारखीच इतर पिकांची स्थिती६३९२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला खरा; मात्र तुरीच्या फुलांचा पिवळा रंग येताच पावसाअभावी फुलाला शेंगा न लागताच फुलासहीत पानेही वाळून खाली पडली व तुराट्याच हाती आल्या. मूग घुगऱ्यापुरताही हातात आला नाही. उडीद हातचे गेले. ८८५ हेक्टरवरच्या भुईमुगाचा पालाच झाला. सोयाबीन मुगासारखे बारीक जन्मले म्हणून भावात त्याने मार खाल्ला.१०५ हेक्टरवर तर चटणी पुरतेही कारळ झाली नाही. हा सारा हिशेब आकडेवारीत मांडला तर अब्जाधिश म्हणणे गैर ठरणार नाही. एका पावसाने शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला हेच खरे म्हणावे लागेल.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र