शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 15:00 IST

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता.

ठळक मुद्दे एका पावसा अभावी शेतकरी कंगाल  तुरीच्या तुऱ्हाट्या आणि कापसाचे झाले खराटे

शिरुर कासार (बीड ) : आतापर्यत कधी अनुभवले नाही आणि ऐकलेही नाही असा प्रसंग तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता. मात्र, तसे न होता शेतकरी पुरता नागवला गेला. पिके गेली, चारा नाही आणि पाणीही नाही अशा उजाड झालेल्या वाळवंटात गुजराण कशी करायची याची भ्रांत. सुखाची झोप येऊ देईना, सरकार मायबाप काय दिलासा देतय यावर सारं आता अवलंबून आहे.

साखर आणि गूळ पिकवणारा तालुका आता पाण्याअभावी पांढऱ्या सोन्याकडे झुकला होता. गेल्या काही वर्षांपासून कापूस आधारभूत मानला जायचा पण त्यालाही आता उतरणी सुरु झाली आणि यावर्षी तर खर्च करुन शेतकरी फक्त तुरीच्या तुराट्या आणि कापसाच्या खराट्याचा मालक बनला. झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यापोटी अब्जाधिश होऊ पहात असलेला शेतकरी हातात कटोरी घेऊन सरकारकडे मदतीची याचना करु लागलाय. बळीराजाच बलहीन झाल्याने विकासाचा कणाच मोडू पहातोय.

तालूक्याचे भौगोलिक क्षेत्र ६५०१८.४ हेक्टर असून, त्यात पेरणी क्षेत्र ५५३३९.६ हेक्टर आहे. या वर्षी खरीपात २७४३१ हेक्टरवर कापूस लागवड केली होती. उगवणीत व पुढे मशागतीच्या जोरावर चित्र चांगले दिसत होते. कापूस उत्पादनाचा अंदाज बांधत बिचारा शेतकरी संध्याकाळी चतकोर भाकरी जास्त खात होता. मात्र, हे सारे मृगजळ ठरले आणि पावसाने होत्याचे नव्हते केले. हेक्टरी किमान १५ ते ३० क्विंटल उतारा होणारा कापसाचा काटा २ ते ३ क्विंटलवर अडकला आणि कापसाचा शेवट झाला. आता आहे तो भाव जरी अपेक्षित उत्पन्न होऊन मिळाले असते तरी शेतकऱ्याचे हात सोन्यासारखे पिवळे झाले असते. त्याच्या हाताला कोळशाच रंग लागला गेला.

कापसासारखीच इतर पिकांची स्थिती६३९२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला खरा; मात्र तुरीच्या फुलांचा पिवळा रंग येताच पावसाअभावी फुलाला शेंगा न लागताच फुलासहीत पानेही वाळून खाली पडली व तुराट्याच हाती आल्या. मूग घुगऱ्यापुरताही हातात आला नाही. उडीद हातचे गेले. ८८५ हेक्टरवरच्या भुईमुगाचा पालाच झाला. सोयाबीन मुगासारखे बारीक जन्मले म्हणून भावात त्याने मार खाल्ला.१०५ हेक्टरवर तर चटणी पुरतेही कारळ झाली नाही. हा सारा हिशेब आकडेवारीत मांडला तर अब्जाधिश म्हणणे गैर ठरणार नाही. एका पावसाने शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला हेच खरे म्हणावे लागेल.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र