शहरं
Join us  
Trending Stories
1
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
2
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
3
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
4
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
5
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
6
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
7
२०२६ मध्ये आयपीओची 'त्सुनामी'! जिओ, फ्लिपकार्ट आणि झेप्टो देणार गुंतवणुकीची सुवर्णसंधी; पाहा पूर्ण यादी
8
वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा
9
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
10
“देशाला काँग्रेस विचाराची नितांत गरज”: हर्षवर्धन सपकाळ; पक्षाचा १४० वा स्थापना दिवस साजरा
11
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
12
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
13
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
14
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
15
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
16
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
17
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
18
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
19
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
20
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 15:00 IST

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता.

ठळक मुद्दे एका पावसा अभावी शेतकरी कंगाल  तुरीच्या तुऱ्हाट्या आणि कापसाचे झाले खराटे

शिरुर कासार (बीड ) : आतापर्यत कधी अनुभवले नाही आणि ऐकलेही नाही असा प्रसंग तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता. मात्र, तसे न होता शेतकरी पुरता नागवला गेला. पिके गेली, चारा नाही आणि पाणीही नाही अशा उजाड झालेल्या वाळवंटात गुजराण कशी करायची याची भ्रांत. सुखाची झोप येऊ देईना, सरकार मायबाप काय दिलासा देतय यावर सारं आता अवलंबून आहे.

साखर आणि गूळ पिकवणारा तालुका आता पाण्याअभावी पांढऱ्या सोन्याकडे झुकला होता. गेल्या काही वर्षांपासून कापूस आधारभूत मानला जायचा पण त्यालाही आता उतरणी सुरु झाली आणि यावर्षी तर खर्च करुन शेतकरी फक्त तुरीच्या तुराट्या आणि कापसाच्या खराट्याचा मालक बनला. झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यापोटी अब्जाधिश होऊ पहात असलेला शेतकरी हातात कटोरी घेऊन सरकारकडे मदतीची याचना करु लागलाय. बळीराजाच बलहीन झाल्याने विकासाचा कणाच मोडू पहातोय.

तालूक्याचे भौगोलिक क्षेत्र ६५०१८.४ हेक्टर असून, त्यात पेरणी क्षेत्र ५५३३९.६ हेक्टर आहे. या वर्षी खरीपात २७४३१ हेक्टरवर कापूस लागवड केली होती. उगवणीत व पुढे मशागतीच्या जोरावर चित्र चांगले दिसत होते. कापूस उत्पादनाचा अंदाज बांधत बिचारा शेतकरी संध्याकाळी चतकोर भाकरी जास्त खात होता. मात्र, हे सारे मृगजळ ठरले आणि पावसाने होत्याचे नव्हते केले. हेक्टरी किमान १५ ते ३० क्विंटल उतारा होणारा कापसाचा काटा २ ते ३ क्विंटलवर अडकला आणि कापसाचा शेवट झाला. आता आहे तो भाव जरी अपेक्षित उत्पन्न होऊन मिळाले असते तरी शेतकऱ्याचे हात सोन्यासारखे पिवळे झाले असते. त्याच्या हाताला कोळशाच रंग लागला गेला.

कापसासारखीच इतर पिकांची स्थिती६३९२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला खरा; मात्र तुरीच्या फुलांचा पिवळा रंग येताच पावसाअभावी फुलाला शेंगा न लागताच फुलासहीत पानेही वाळून खाली पडली व तुराट्याच हाती आल्या. मूग घुगऱ्यापुरताही हातात आला नाही. उडीद हातचे गेले. ८८५ हेक्टरवरच्या भुईमुगाचा पालाच झाला. सोयाबीन मुगासारखे बारीक जन्मले म्हणून भावात त्याने मार खाल्ला.१०५ हेक्टरवर तर चटणी पुरतेही कारळ झाली नाही. हा सारा हिशेब आकडेवारीत मांडला तर अब्जाधिश म्हणणे गैर ठरणार नाही. एका पावसाने शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला हेच खरे म्हणावे लागेल.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र