शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:13 IST

"पोलिसांना राजकीय दबाव असल्याशिवाय न्याय मिळत नाही"; चार वर्षांपासून वडिलांच्या शोधात असलेल्या मुलाची मुख्यमंत्र्यांना भावनिक हाक

बीड: "बीडला पहिली रेल्वे धावेल आणि त्याच रेल्वेखाली जीवन संपवणारा मी पहिला असेल." हे शब्द आहेत एका हतबल मुलाचे, जो गेल्या चार वर्षांपासून आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे निराश झालेल्या प्रसाद रत्नाकरराव बोरे (वय ३८) या तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलवर पत्र लिहून आपला जीव देण्याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून व्यथा मांडण्याच्या प्रयत्न केला असता त्यांची वेळ देखील मिळत नसल्याचे बोरे यांनी हतबल होऊन सांगितले.

जिल्ह्यात बहुचर्चित असलेली रेल्वे प्रत्यक्षात १७ सप्टेंबर रोजी, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी रोजी सुरू होणार आहे.बीड ते अहिल्यानगर रेल्वेला १७ सप्टेंबरला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. प्रसाद बोरे यांना शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आला नाही. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून हरवलेल्या वडिलांना शोधून देण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाची अपेक्षित साथ नाही, स्वतः राज्यभर शोध घेऊनही वडिल सापडत नाहीत, यामुळे जगण्यात अर्थ राहिला नसल्याने हतबल होऊन बोरे यांनी जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?बीडमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले प्रसाद बोरे यांचे वडील रत्नाकर अंबादास बोरे हे २८ जुलै २०२१ पासून पांगरी रोड, बीड येथून बेपत्ता आहेत. वडिलांच्या मिसिंगची तक्रार दाखल केल्यापासून प्रसाद यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड येथे एका सीसीटीव्हीमध्ये त्यांचे वडील दिसले, अशी माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी विशेष तपास केला नाही, असा आरोप प्रसाद यांनी पत्रात केला आहे.

'पोलिसांची उत्तरं बालिशपणाची होती'प्रसाद यांनी आपल्या पत्रात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "आम्ही बीड पोलिसांना कळवले, पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली, पण बीड पोलिसांची उत्तरं अगदी बालिशपणाची होती. राजकीय दबाव असल्याशिवाय पोलीस काम करत नाहीत, हे तेव्हा लक्षात आले."चार वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वडिलांना शोधूनही ते सापडले नाहीत. प्रसाद यांच्या मते, त्यांच्या वडिलांचे कोणाशीही घरगुती किंवा वैयक्तिक वाद नव्हते, तरीही ते अचानक बेपत्ता झाले. या आघाताने त्यांच्या आईची तब्येतही बिघडली आहे.

"सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही"प्रसाद यांनी आपल्या पत्रात, बीडमध्ये सामान्य नागरिकांना मेल्याशिवाय न्याय मिळत नाही, असे गंभीर विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, "गेल्या महिन्यात एक मुलगा जो ७ वर्षांपूर्वी हरवला होता, तो पोलिसांना सापडला. मग माझ्या वडिलांना चार वर्षांपासून पोलीस का शोधू शकले नाहीत?" हा प्रश्न त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

आत्महत्येनंतरच्या तीन अटीआपल्या पत्रात प्रसाद यांनी १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वेच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिली आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांना तीन महत्त्वाच्या इच्छाही सांगितल्या आहेत:- त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेह त्यांच्या परिवाराकडे घरपोच देण्यात यावा.- परिवाराला कोणतीही आर्थिक मदत (भीक) दिली जाऊ नये, कारण त्यांचा परिवार स्वाभिमानी आहे.- या आत्महत्येचे राजकारण केले जाऊ नये.

या पत्राने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आता पोलीस आणि सरकार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडPoliceपोलिस