शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'बेवारस असलो तरी माझा शेवट बेवारस नको';अखेर अंतिम इच्छा झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:07 IST

ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.

ठळक मुद्दे माणुसकी जिवंत आहे !

 - अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई : मी जरी बेवारस असलो तरी माझा अंत्यविधी बेवारसपणे होऊ देऊ नका. माझा अंत्यविधी मानवलोकने करावा, अशी अखेरची इच्छा मारोती सीताराम कदम (वय ५५) यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. ही त्यांची अखेरची इच्छा मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे. 

येथील मारोती सिताराम कदम हे २५ वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात राहयला आले. कुटुंब दुभंगल्याने ते अंबाजोगाईत कोठून आले याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जोपर्यंत मनगटात बळ होते. तोपर्यंत ते मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला. अन् ते पूर्णत: परावलंबी बनले. अशा निराधारांना अंबाजोगाई व परिसरात मानवलोक परिवाराचा आधार नित्याचा असतो. मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयाने मारोती कदम यांची नोंदणी करून त्यांना मोफत राशन, निराधार योजनेची सवलत उपलब्ध करून दिली. त्यांचे औषधोपचारही मोफत केले. मात्र, या आजाराचा विळखा त्यांना जडल्याने आठवडाभरापूर्वी त्यांचे निधन झाले. मारोती कदम निराधार असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ मिळेना. त्यांना निराधार घोषित केले. कोणीही नातेवाईक मागणी करत नसल्याने शेवटी त्यांचा मृतदेह विनंतीनुसार मानवलोककडे सोपविण्यात आला. मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते शाम सरवदे यांनी मारोतीरावांचे पुत्र होऊन सर्व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले व मारोतीरावांची अखेरची इच्छा पूर्ण केली.  या अंत्यविधीसाठी मानवलोकच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अंबेकर, रमाकांत उडाणशिव, शेख मुख्तार, गंगाधर ढोणे, दिलीप मारवाळ, सतीश कांबळे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक