शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

'बेवारस असलो तरी माझा शेवट बेवारस नको';अखेर अंतिम इच्छा झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:07 IST

ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.

ठळक मुद्दे माणुसकी जिवंत आहे !

 - अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई : मी जरी बेवारस असलो तरी माझा अंत्यविधी बेवारसपणे होऊ देऊ नका. माझा अंत्यविधी मानवलोकने करावा, अशी अखेरची इच्छा मारोती सीताराम कदम (वय ५५) यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. ही त्यांची अखेरची इच्छा मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे. 

येथील मारोती सिताराम कदम हे २५ वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात राहयला आले. कुटुंब दुभंगल्याने ते अंबाजोगाईत कोठून आले याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जोपर्यंत मनगटात बळ होते. तोपर्यंत ते मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला. अन् ते पूर्णत: परावलंबी बनले. अशा निराधारांना अंबाजोगाई व परिसरात मानवलोक परिवाराचा आधार नित्याचा असतो. मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयाने मारोती कदम यांची नोंदणी करून त्यांना मोफत राशन, निराधार योजनेची सवलत उपलब्ध करून दिली. त्यांचे औषधोपचारही मोफत केले. मात्र, या आजाराचा विळखा त्यांना जडल्याने आठवडाभरापूर्वी त्यांचे निधन झाले. मारोती कदम निराधार असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ मिळेना. त्यांना निराधार घोषित केले. कोणीही नातेवाईक मागणी करत नसल्याने शेवटी त्यांचा मृतदेह विनंतीनुसार मानवलोककडे सोपविण्यात आला. मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते शाम सरवदे यांनी मारोतीरावांचे पुत्र होऊन सर्व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले व मारोतीरावांची अखेरची इच्छा पूर्ण केली.  या अंत्यविधीसाठी मानवलोकच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अंबेकर, रमाकांत उडाणशिव, शेख मुख्तार, गंगाधर ढोणे, दिलीप मारवाळ, सतीश कांबळे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक