शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'बेवारस असलो तरी माझा शेवट बेवारस नको';अखेर अंतिम इच्छा झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:07 IST

ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे.

ठळक मुद्दे माणुसकी जिवंत आहे !

 - अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई : मी जरी बेवारस असलो तरी माझा अंत्यविधी बेवारसपणे होऊ देऊ नका. माझा अंत्यविधी मानवलोकने करावा, अशी अखेरची इच्छा मारोती सीताराम कदम (वय ५५) यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. ही त्यांची अखेरची इच्छा मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ज्या निराधारांना कोणाचा आधार नाही. अशा अनेक निराधारांचे पालकत्व आजही मानवलोक ही संस्था खंबीरपणे सांभाळत आहे. 

येथील मारोती सिताराम कदम हे २५ वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरात राहयला आले. कुटुंब दुभंगल्याने ते अंबाजोगाईत कोठून आले याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जोपर्यंत मनगटात बळ होते. तोपर्यंत ते मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवत. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा आजार जडला. अन् ते पूर्णत: परावलंबी बनले. अशा निराधारांना अंबाजोगाई व परिसरात मानवलोक परिवाराचा आधार नित्याचा असतो. मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयाने मारोती कदम यांची नोंदणी करून त्यांना मोफत राशन, निराधार योजनेची सवलत उपलब्ध करून दिली. त्यांचे औषधोपचारही मोफत केले. मात्र, या आजाराचा विळखा त्यांना जडल्याने आठवडाभरापूर्वी त्यांचे निधन झाले. मारोती कदम निराधार असल्याने त्यांचा अंत्यविधी करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ मिळेना. त्यांना निराधार घोषित केले. कोणीही नातेवाईक मागणी करत नसल्याने शेवटी त्यांचा मृतदेह विनंतीनुसार मानवलोककडे सोपविण्यात आला. मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते शाम सरवदे यांनी मारोतीरावांचे पुत्र होऊन सर्व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले व मारोतीरावांची अखेरची इच्छा पूर्ण केली.  या अंत्यविधीसाठी मानवलोकच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अंबेकर, रमाकांत उडाणशिव, शेख मुख्तार, गंगाधर ढोणे, दिलीप मारवाळ, सतीश कांबळे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक