शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST

झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देप्रशासनाला सवाल ! सांगा, जगायचं कसं ? : बीड जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांमध्ये अफवांची भीती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतोत. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे पोट भरते. परंतु मागच्या काही दिवसांपासून आमच्या वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. या अफवा वाऱ्यासारख्या राज्यभर पसरल्या. त्यामुळे आता झोपडीबाहेर (घराबाहेर) पडायची सुद्धा भीती वाटत आहे. पायचं चौकटीबाहेर पडत नाही. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी इ. भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना जमावाने मारहाण केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे पाच जणांचा बळी गेला होता. राज्यभरात अनेक लोक या मारहाणीचे बळी ठरले होते. त्यामुळे दारोदारी भटकून पोट भरणाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. अगोदरच हलाखीची परिस्थिती असल्याने एका वेळच्या जेवणाची या समाजासमोर पंचाईत असते. अशातच या अफवांचे पेव वाढल्याने त्यांचे जगणेच मुश्कील बनले आहे.हाच धागा पकडून गुरूवारी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा.बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्या तोंडून निघणाºया प्रत्येक वाक्यातून त्यांच्या जगण्याचा संघर्ष अन् प्रशासनाबद्दलचा रोषही व्यक्त होत होता.काय होत्या मागण्या?धुळे जिल्ह्यातील मारहाणीत मृत्यू झालेल्या गोसावी समाजातील पाचही लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत द्या.धुळे प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन मयतांना न्याय द्यावा.बलुतेदार-भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तींना शासनाने ओळखपत्र द्यावे, त्यावर त्यांची संपूर्ण माहितीसह त्यांच्या व्यवसायाची नोंद असावी.बापट आयोगाची अंमलबजावणी करावी.विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून समाजाला मुख्य प्रवाहात घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

टॅग्स :agitationआंदोलनBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडMorchaमोर्चा