शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत बसलं तर उपाशी; बाहेर पडलं तर मरणाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:29 IST

झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देप्रशासनाला सवाल ! सांगा, जगायचं कसं ? : बीड जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांमध्ये अफवांची भीती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतोत. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे पोट भरते. परंतु मागच्या काही दिवसांपासून आमच्या वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. या अफवा वाऱ्यासारख्या राज्यभर पसरल्या. त्यामुळे आता झोपडीबाहेर (घराबाहेर) पडायची सुद्धा भीती वाटत आहे. पायचं चौकटीबाहेर पडत नाही. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, अशी परिस्थिती आमच्यासमोर सध्या आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं, असा सवाल प्रशासनाला उपस्थित करीत डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.

मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी इ. भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना जमावाने मारहाण केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे पाच जणांचा बळी गेला होता. राज्यभरात अनेक लोक या मारहाणीचे बळी ठरले होते. त्यामुळे दारोदारी भटकून पोट भरणाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. अगोदरच हलाखीची परिस्थिती असल्याने एका वेळच्या जेवणाची या समाजासमोर पंचाईत असते. अशातच या अफवांचे पेव वाढल्याने त्यांचे जगणेच मुश्कील बनले आहे.हाच धागा पकडून गुरूवारी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा.बलुतेदार अलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समस्या पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्या तोंडून निघणाºया प्रत्येक वाक्यातून त्यांच्या जगण्याचा संघर्ष अन् प्रशासनाबद्दलचा रोषही व्यक्त होत होता.काय होत्या मागण्या?धुळे जिल्ह्यातील मारहाणीत मृत्यू झालेल्या गोसावी समाजातील पाचही लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत द्या.धुळे प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन मयतांना न्याय द्यावा.बलुतेदार-भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तींना शासनाने ओळखपत्र द्यावे, त्यावर त्यांची संपूर्ण माहितीसह त्यांच्या व्यवसायाची नोंद असावी.बापट आयोगाची अंमलबजावणी करावी.विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून समाजाला मुख्य प्रवाहात घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

टॅग्स :agitationआंदोलनBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडMorchaमोर्चा