शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:28 IST

पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देकपाशीच्या माध्यमातून चांगल्या उत्पन्नासाठी मत-मतांतरे

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे.

कपाशीच्या माध्यमातून शेतकºयांना चांगले उत्पन्न घेता यावे म्हणून कृषी क्षेत्रातील जाणकारांनी एक गाव एक वाण संकल्पना मांडली आहे. यातून पीक व्यवस्थापन वेळीच करणे सुलभ होऊ शकते, असे त्यांचे मत असून दुसरीकडे हा प्रयोग राबविणे कठीण असल्याचे कृषी विभागातील अधिकाºयांना वाटते. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल याकडे लक्ष लागले आहे.

कापूस पिकाची उत्पादकता कमी होण्याची कारणेकोरडवाहू क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड, हलकी, मध्यम, भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करणे, एकाच क्षेत्रामध्ये अनेक वाणांची लागवड करणे, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांची चुकीची व अवेळी मात्रा देणे, आंंतरमशागत चुकीच्या पध्दतीने करणे, कीड व रोग नियंत्रण करतांना औषधांची चुकीची निवड करणे, हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता, हेक्टरी झाडांची अपूरी संख्या, सिंंचनाचा अपुरा आणि अयोग्य वापर, सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा अपुरा वापर.

उपाययोजनाया कारणांसह इतर घटाकांमुळे कापूस पिकाची उत्पादकता वरचेवर कमी कमी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे यासाठी बीड जिल्ह्यात काय करता येईल यावर एक अभ्यास करण्यात आला. जिल्ह्यातील जमीन व पाणी याचा अभ्यास केला असता ‘एक गांव एक वाण’ ही संकल्पना पुढे आली. कपाशीच्या कोणत्याही वाण अथवा जातीवर शेतकºयांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त वाण शेतात लावतात. परिणामी फायदे होण्याऐवजी तोटेच पदरी पडतात. यासाठी एक गाव एक वाण ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे कृषी क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले. अक्षयतृतीयेपासून नांगरटीच्या क्षेत्रामध्ये मोगडा-पाळीच्या कामांना वेग येतो. या कालावधीत लग्नसराईचा धुमधुडाका होता. त्यामुळे मंदावलेल्या शेतीकामांना आता वेग आला आहे. पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी कुळवाच्या तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पूर्व-पश्चिम करावयाची असते.

कपाशी आहे तरच चलनमराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्टÑामध्ये नगदी पीक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढला आहे. उसानंतरचे नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते. कापसाच्या उत्पादनावर पुढील वर्षाचे व्यवहार ठरतात. कापसाचे पैसे आले की, लगीनसराई जोरात होते. दैनंदिन व्यवहारामध्ये चलन फिरते राहते. इतर पिकांची उत्पादकता कमी असल्यामुळे तत्काळ पैसा देणारे पीक म्हणून कपाशीचे महत्त्व मोठे आहे.

शेतकरी तयार होतील का?मागील वर्षी अकोला, अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाने पुढाकार घेत २५० एकरात एक गाव एक वाण ही संकल्पना राबविली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करण्यात आले. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले. असे प्रयोग बीड जिल्ह्यात होण्यासाठी शेतकºयांची मानसिकता तयार होईल का ? हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असा प्रयोग यापूर्वी जिल्ह्यात यशस्वी ठरला नव्हता.

असा प्रयोग राबविणे कठीणएक गाव , एक वाण हा प्रयोग जिल्ह्यात राबविणे कठीण आहे. पाच- सात वर्षांपूर्वी असा प्रयत्न जिल्ह्यात झाला होता. काही कंपन्यांनी उत्पादीत मालाची हमी घेतली होती. मात्र उत्पादनाच्या दर्जाबाबत शाश्वती नाही. तसेच या प्रयोगामुळे एकाच वाणाची मागणी होईल यातून काही कंपन्या हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील. यातून अनिष्ट प्रकार होतील. त्यापेक्षा शेतकºयांनी कमी कालावधीचा कापूस लावणेच उत्तम ठरेल.- डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि. प. बीड.

विविध वाणावर भरनेमके कोणत्या वाणातून भरघोस उत्पन्न मिळेल याचा नेम नसल्याने शेतकरी एकापेक्षा जास्त वाण लावतात.एखाद्या वाणातून उत्पन्न कमी मिळाले अथवा नुगकसान झाले तर दुसºया वाणातून त्याची कसर भरण्यासाठी अशी लागवड ते करतात.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसMarathwadaमराठवाडा