शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘तोडपाणी’वाला वारसदार कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:42 IST

बेईमानी मला जमत नाही, इमानदारींने मी काम करते. जो स्वार्थासाठी पदोपदी वारसा बदलतो, ज्याचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधिमंडळात लक्षवेधीसाठी ‘रेट’ ठरविणारे हे मुंडेसाहेबांचे वारसदार असूच शकत नाहीत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला चढवित आगामी लोकसभा निवडणुकीचे एका अर्थाने रणशिंगच फुंकले.

ठळक मुद्देपरळी येथील सभा : धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा आणि प्रीतम मुंडे यांचा थेट हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : बेईमानी मला जमत नाही, इमानदारींने मी काम करते. जो स्वार्थासाठी पदोपदी वारसा बदलतो, ज्याचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधिमंडळात लक्षवेधीसाठी ‘रेट’ ठरविणारे हे मुंडेसाहेबांचे वारसदार असूच शकत नाहीत, अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला चढवित आगामी लोकसभा निवडणुकीचे एका अर्थाने रणशिंगच फुंकले. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या परळीतील मोंढा मार्केटमधील आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी खा.डॉ.प्रीतम मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.आर. टी. देशमुख, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अनिल तांदळे, प्रकाश जोशी, प्रकाश सामत, डॉ. शालिनी कराड आदी उपस्थित होते.परळी ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची व माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. त्यामुळे इथल्या जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी शहराच्या भविष्याची दोरी माझ्या हातात दिली आहे. इथे मला स्वच्छ, सुंदर व भयमुक्त वातावरण तयार करायचे आहे. मी तुमच्यासमोर केंव्हाही नतमस्तक आहे पण ज्या लोकांनी इथलं वातावरण गढूळ केलयं त्यांना साथ देण्याची चूक कधीही करू नका, विधान परिषदेची एकही जागा ज्याना निवडून आणता आली नाही, तो नेता कसला, असा टोलाही त्यांना पंकजा मुंडे यांनी लगावला. शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठीशी आहे. समोरुन येणारा वार मी अगोदर माझ्या खांद्यावर झेलेल, असा विश्वास देत ‘ज्या दिवशी मला घालवाल. त्यादिवशी तुमचे परळीत राहणे अवघड होईल, गुंडगिरी वाढेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिली.मी माझ्या वडिलांचे नाव लावते याचा अनेकांना त्रास होतो. राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा विकास करण्यासाठी त्यांना दमडीही आणता आली नाही. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. विकास आपणच करु शकतो. परळी नगर परिषद जर भाजपच्या ताब्यात असती तर पाच कोटीच काय, पाचशे कोटीची कामे आणली असती, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांचे नाव न घेता आक्रमक होऊन भाषण केले. पंकजा मुंडे यांच्यामुळेच ‘२५१५’ हा निधी सर्वांना माहीत झाला. जलयुक्त शिवारमधून त्यांनी व खासदार निधीतून मी या शहराला पाणी दिल्याचे त्यांनी सांगितले. आ. सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली. गायब सिनेमाचा उल्लेख करुन त्यांनी खिल्ली उडवली.उमेदवार कुणी असो, आम्हाला फरक पडत नाहीबीड : विरोधी उमेदवार कुणीही असो, आम्हाला काही फरक पडत नाही. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी संसदेत आणि मतदार संघात भरीव कामगिरी केली. विकासासाठी निधी आणलाच नाही तर कामे करून मार्गी लावला. त्यामुळे लोकसभेसाठी आमच्या विरोधात कोण? याची चिंता आम्ही करत नाही कारण मतदार आणि विकास कामे आमच्या पाठीशी आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड येथे आल्या असता विश्रामगृहावर चर्चा करताना त्या बोलत होत्या. राष्टÑवादीतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, काय फरक पडतो? विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे एकमेकाच्या विरोधात लढलो. मी जिंकले. एकवेळ तर मी सोडून बाकी पाचही मतदार संघात राष्टÑवादीचे उमेदवार होते. ते जिल्ह्याचे नेते होते. काय झाले.. मुंडेसाहेब विजयी झाले. आता तर उलट स्थिती आहे, बीड सोडून आमचे सहा आमदार आहेत. मतदार हे काम बघतात. त्यामुळे निकालाची, उमेदवाराची चिंता विरोधकांनी करावी. जिल्ह्याच्या विकासासाठी इतका निधी आणला आहे की तो वेळेत कसा खर्च होईल, याची चिंता आम्हाला आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे