शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

'घराघरात भांडण लावणारे रडताहेत'; क्षीरसागरांचा पवार काका-पुतण्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:56 IST

आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे.

ठळक मुद्देकरावे तसे भरावे केवळ प्रसिध्दी, बोर्डासाठी कधीही काम केले नाही. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी लगावला टोला.

बीड : आमच्या नियतीत खोट नसून आमची नियत साफ आहे. आम्ही कुणाचे वाईट केले नाही आणि भविष्यातही आमच्याकडून तसे होणार नाही. जसे कर्म तसे फळ मिळते. घराघरात भांडण लावणारे आज रडत आहेत, असा टोला  नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना लगावला.

ते म्हणाले की, मागील अनेक निवडणुकात या भागातील नागरिकांनी आण्णांना पक्षीय भेद बाजूला सारून खंबीर साथ दिलेली आहे. आपण वॉचमन, ड्रायव्हर, नोकर कामावर ठेवतांना तीनदा विचार करतो, ही विधानसभेची निवडणूक आहे. आपला लोकप्रतिनिधी कोण असावा. त्याला विकासाची तळमळ आणि निर्णय घेण्याची क्षमता असावी.  आण्णांना विकासाची जाण असून स्व.काकूंच्या काळापासून सर्वाना सोबत घेवून माणूस आणि माणुसकी जोपासत विकास कामांना सदैव प्राधान्य देत आण्णांच्या माध्यमातून दारूल उलूम, इदगा कंपाऊड, बालेपीर कब्रस्थान कंपाऊंड भित, सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली.

मोमीनपुरा भागात नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मैनुद्दीन भाई, राजु भाई, राजु राणा, माजेद कुरेशी, एकबाल भाई, कलाम, शाहरु ख भाई, शेख राजू, राजभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.    पुढे बोलतांना नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की विकास कामाच्या बळावर आम्ही मते मागत असून विरोधकांनी विकासाचे एक तरी काम केले का? हे त्यांनी दाखवून द्यावे. विकास कामे करण्यासाठी विकासाची दृष्टी असावी लागते ती केवळ ना.आण्णांकडे असून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याचा पाठपुरावा करून आण्णांनी शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अमृत अटल पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सांस्कृतिक संभागृह, अंतर्गत रस्ते यासह नागरी विकासाची कामे सर्वाना सोबत घेवून केलेली आहेत. आम्ही विकासाची अनेक कामे केली पण केवळ प्रसिध्दी, बोर्डासाठी कधीही काम केले नाही. मतदार संघाच्या विकासासाठी आणि भाईचारा, शहराच्या शांततेसाठी लोक आम्हाला विश्वासाने मतदान करीत आहेत, असे ते यावेळी म्हणाले. 

यावेळी बोलतांना राजु राणा म्हणाले की स्व.काकूंच्या काळापासून क्षीरसागर परिवाराने शांतता, विकास आणि भाईचारा जोपासला आहे. परिसराच्या विकासासाठी आण्णांच्या मागे ताकत उभी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना कलीम म्हणाले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वानी आण्णांच्या मागे मोठी शक्ती उभी करण्याची आवश्यकता असून स्व.काकू व आण्णांनी मागील चाळीस वर्षापासून विकासाचे जाळे निर्माण केले आहे. आण्णा हे काम करणारे राज्य पातळीवरील नेतृत्व असून त्यांचा विजय कोणी ही रोखू शकत नाही. विरोधक विरोधासाठी विरोध करतात पण विकासाची जाण असलेल्या आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलतांना राजुभाई नवले म्हणाले की मोमीनपुरा भागात शिवसेना सुरवातीला मी आणली, आपल्या उज्वल भविष्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा. याप्रंसगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमासाठी परिसरातील व्यापारी, नागरिक, युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडShiv SenaशिवसेनाBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर