शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करत केली नवीन आयुष्याची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:36 IST

’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

ठळक मुद्देऐश्वर्या व निखिल या नवदांपत्यांचा निर्णय 

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई: विवाहानंतर सासरी येताच आयोजित स्वागत समारंभाची सुरुवात नव वधु-वरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना साडीचोळी भेट देऊन, त्यांचा सन्मान करून आपल्या  नवीन आयुष्याची सुरुवात केली. हा उपक्रम ’आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई  तालुक्यातील भारज येथे साकार झाला. 

अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे येथील उद्योजक व्यंकटराव शिंदे यांचे सुपुत्र निखिल याचा विवाह पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार  यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला.विवाहाप्रीत्यर्थ मंगळवारी भारज येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्वागत समारंभाची सुरुवात नवदाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करून केली. या सर्व महिलांना साडीचोळीचा आहेर  भेट देण्यात आला. तसेच या सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. 

विवाहावर लाखो रुपयांची उधळण, आतिषबाजी व विविध माध्यमांतून केली जाते. समाजात शुभकार्यात विधवांना दूर ठेवले जाते. मात्र, शिंदे व पवार कुटुंबियांनी आपल्या या नवीन वधूवरांची आयुष्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जोपासून केली. यावेळी भव्य समारंभ घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ, अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रूईकर, उपनगराध्यक्षा सविता लोमटे, ज्योती शिंदे, अशोकराव कदम, संयोजक व्यंकटराव शिंदे, शिवाजी शिंदे, वसंत शिंदे, आधार माणुसकीचा चे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याmarriageलग्नBeedबीड