शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘हरवले आभाळ...’,सुदाम भोंडवेसह कुटुंबातील चौघे ठार, सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 12:10 IST

अनाथांचा आधार हरपला; चाकणजवळ अपघाताची वार्ता कळताच बीड जिल्हा सुन्न

- अजय जोशीपाटोदा (बीड) : गरीब, अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या आणि शेकडो-हजारो गरीब, अनाथ मुलांची हक्काची सावली झालेले सुदाम भोंडवे व सिंधुताई या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या घटनेचे वृत्त समजताच अनाथ मुलांचेच नव्हे तर संपूर्ण गुरुकुल परिवाराचे आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांचे काळीज अक्षरशः हेलावून गेले. सुदाम काकांच्या जाण्याने सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला, अशी संवेदना प्रत्येक जण व्यक्त करीत होता.

नेहमी दुष्काळी छायेत आणि आर्थिकदृष्ट्या मागास बीड जिल्ह्यातून साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात दरवर्षी दोन लाखांहून जास्त कुटुंबे सहा महिन्यांसाठी तात्पुरते स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येतो. हा अभावच सामाजिक समस्यांचे मूळ असल्याने १९८६ मध्ये राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम भोंडवे यांनी स्वत:ची जमीन देत सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली. एका छोट्याशा झोपडीतून ज्ञानदानाची सुरुवात करत गत ३७ वर्षांत तीन हजारांवर विद्यार्थी सोनदरा गुरुकुलात घडले आहेत. शासनाचा एक छदामही न घेता मूल्याधिष्ठित पिढी घडवून नवरचना साधण्याचे कार्य सुदाम भोंडवेंकडून सुरू होते. गुरुकुलातील मुले म्हणजेच त्यांचं कुटुंब होतं. गुरुकुलाचा उत्तरोत्तर कार्यविस्तार व्हावा, हेच त्यांचे ध्येय होते. 

गुरुकुलाची जबाबदारी अश्विन भोंडवे सहकारी कार्यकर्त्यांवर सोपवल्यानंतरही काकांमध्ये नव्या कामाची सुरुवात करण्याची ऊर्जा दिसली. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मंगळवारी सोनदरा गुरुकुल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुदाम काका, सिंधू मामी, कार्तिकी व चिमुकली आनंदी यांच्या एका क्षणात जाण्याने आभाळ कोसळले. त्यामुळे सारे गुरुकुल अनाथ झाले. ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी,’ अशा ध्येयाने वाटचाल करणाऱ्या सुदाम काकांच्या जाण्याने सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला आहे.

डोळ्या देखत गमावले अख्खे कुटुंब अश्विन भोंडवे हे वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी आणि मुलगी आनंदी यांच्यासह कारमधून ( एमएच १२ ईएम २९७८ ) चाकणकडे चालले होते. याचवेळी अपघात झाला. यात केवळ अश्विन बचावले. डोळ्यादेखत अख्खे कुटुंब गमावल्याने अश्विन देखील बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड