शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:49 IST

धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

ठळक मुद्देधारूर घाटातील घटना : साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा दहा लाखांचा ऐवज लुटला

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली.केज तालुक्यातील सादोळा येथील संभाजी इंगळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच २० सीटी ११२५) आडस येथील विठ्ठल माने यांचा १६ टन कापूस घेऊन रविवारी रात्री ८ वाजता शेख इलियास शेख मुसा आणि बिभीषण शंकर फसके हे ट्रकचालक केजहून गुजरात मधील अमरोलीकडे जाण्यासाठी निघाले होते.रात्री १० वाजताच्या सुमारास धारूर घाटाच्या पुढे जाताच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा ट्रक अडवला. त्यापैकी दोघेजण तेलगावच्या पुढे जाण्याच्या बहाण्याने विनंती करून ट्रकमध्ये बसले. टालेवाडी फाट्याजवळ त्यांनी ट्रक थांबविला. तेवढ्यात मागून एका जीपमधून आणखी तिघेजण आले.तू आमच्या गाडीला कट मारून आलास असा वाद निर्माण करून त्यांनी थेट ट्रकच्या केबिनचा कब्जा घेतला आणि ट्रक चालविण्यास सुरुवात केली. धावत्या ट्रकमध्ये त्यांनी दोन्ही चालकास लाकडी बेदम मारहाण केली. त्यानंतर एकाने स्वत:जवळील पिस्तूल बाहेर काढत केबिनमध्ये वरच्या दिशेने एक गोळी झाडली. गोळी मारण्याची धमकी देत दोन्ही चालकांना बळजबरीने कसलेतरी औषध पाजले.थोड्या वेळानंतर माजलगाव येथील साखर कारखान्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी ट्रक थांबविला आणि दोन्ही चालकांना जीपमध्ये टाकले. तब्बल दोन-अडीच तास त्यांनी दोन्ही चालकांना जीप मधून फिरवले आणि तोपर्यंत इकडे अज्ञात ठिकाणी ट्रक नेऊन अंदाजे ९ लाख ५३ हजार रुपये किमतीचा सर्व कापूस काढून घेतला.ट्रक संपूर्ण रिकामा केल्याची फोनवरून खात्री होताच जीप मधील दोन्ही ट्रक चालकास बेशुद्ध पडेपर्यंत पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याजवळील २१ हजार रुपये रोख, दोन्ही मोबाईल काढून घेण्यात आले. त्यानंतर दरोडेखोरांनी दोन्ही चालकांना बेशुद्धावस्थेत जालना-मंठा रोडवर ट्रकसहित सोडून दिले.थोड्या वेळाने शुद्धीत आल्यानंतर चालकांनी कसाबसा जवळचा टोलनाका गाठला. तिथल्या लोकांनी दोन्ही जखमी चालकांना जालना येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ट्रकचालक शेख इलियास शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून बुधवारी सकाळी सहा अज्ञात दरोडेखोरांवर धारूर पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. धारुर घाटात ट्रक लुटत बेदम मारहाण करण्याच्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीती पसरली असून, दरोडेखोरांचा तपास लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी