शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

घरातून हद्दपार झालेल्यांचा मात्यापित्यांचा आधार भक्तीप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:18 IST

कसलेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकांच्या पाठबळावर कार्य सुरु आहे

ठळक मुद्देतब्बल २७ वृद्धांचा सांभाळ लोकांच्या पाठबळावर जनसेवेचा वसा

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (जि. बीड) : जीवनात अपार कष्ट सोसल्यानंतर आयुष्याचा उत्तराधार्थ सुखात जावा ही अपेक्षा वृद्ध बाळगून असतात. मात्र, यात अनेकांच्या वाट्याला निराशाच येते. अशा निराश वृद्ध माता-पित्यांचा अंबाजोगाई येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रम खऱ्या अर्थाने आधार बनला आहे.  आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर सध्या नाकारलेल्या २७ वृद्धांचा आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळ करत आहे. कसलेही शासकीय अनुदान नसताना केवळ लोकांच्या पाठबळावर त्याचे हे काम अडीच वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. 

मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालयातून सामाजिक शिक्षण घेताना डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या कार्याचा प्रभाव आणि अनेक वृद्धांचा सहवास लाभल्याने पवन यास वृद्धांच्या समस्या, त्यांची गरज, अडचणी समजल्या. काहीतरी करण्याच्या  उर्मीने वृद्धांसाठी आश्रम काढायचा संकल्प केला.  अंबाजोगाई परिसरात त्या काळात समस्त महाजन ग्रुपतर्फे जलसंधारणाची कामे होत होती. त्यावेळी पवन याने भारतीय जैन संघटनेचे धनराज सोळंकी यांच्या माध्यमातून समस्त महाजनचे अध्यक्ष गिरीशभाई शहा यांच्याशी संपर्क साधला. वृद्धाश्रमाची संकल्पना त्यांनाही पटली. देवेंद्र जैन, नूतन देसाई, पृथ्वीराज कावेरिया, अल्पेश जैन यांच्या प्रेरणेतून अंबाजोगाई-परळी रस्त्यावर दूरदर्शन केंद्राच्या बाजूला जीवनआधार भक्तीप्रेम  इमारत गिरीशभाईंनी उभी करून दिली.

सुरुवातीला बसस्थानक परिसरातील निराधार, वृद्धांचा सांभाळ पवनने सुरु केला.  आज २० पुरुष व ७ वृद्ध महिला येथे आश्रयाला आहेत. या सर्व वृद्धांची सेवा शुश्रुषा पवन एखाद्या कुटुंबाप्रमाणे करतो. त्यांना काय हवे, काय नको ही सर्व जबाबदारी तो समर्थपणे पार पाडतो. वृद्धांना दोनवेळचे जेवण, दोन वेळा चहा, प्रार्थना, श्रमदान असा आश्रमाचा दिनक्रम ठरलेला आहे. या वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

प्रत्येकाने उचलला खारीचा वाटा१५ आॅगस्ट २०१६ रोजी सुरु झालेल्या या आश्रमाची वाटचाल लोकांच्या पाठबळावरच सुरू आहे. आश्रमाचा प्रत्येक महिन्याचा किराणा उचलण्याची जबाबदारी अंबाजोगाई तालुक्यातील आठ दानशुरांनी घेतली आहे. तर चार महिने शिल्लक आहेत. आश्रमाचे वीजबील, भाजीपाला व गॅस सिलिंडरचा खर्च करण्यासाठी दानशुरपुढे सरसावले पाहिजे. या आश्रमातील वृद्धांच्या औषधांचा खर्च अंबाजोगाईचे श्रीकांत बजाज, ललित बजाज व शाम बजाज करतात. पाण्याची व्यवस्था, इंधन विहीर, शुद्ध पाण्याचा प्रकल्प  सुविधा  धनराज सोळंकी यांनी उपलब्ध करून दिली. आता गरज आहे ती दानशुरांच्या पाठबळाची . 

रुग्णवाहिकेची गरजवृद्धाश्रम ते अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे अंतर जवळपास १० किलोमीटर आहे. आश्रमातील वृद्धांना सातत्याने वैद्यकीय उपचारासाठी रिक्षा अथवा दुचाकीवरुन नेण्याची वेळ गिरवलकर यांच्यावर येते. त्यांना वृद्धांसाठी रुग्णवाहिकेची आता नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

वृद्धच चालवतात गोशाळाजीवन आधार भक्तीप्रेम आश्रमातील वृद्धांनीच पवन गिरवलकर यांच्याकडे आग्रह धरुन गोशाळा सुरु केली. या गोशाळेमध्ये गायींची संख्या वाढली आहे. ही गोशाळा येथील वृद्धच सांभाळतात. इतकेच नाही तर वृद्धाश्रमात स्वयंपाक, स्वच्छता या कामातही आश्रमातील वृद्धांचाच पुढाकार असतो. या आश्रमात एकही कर्मचारी कामासाठी नाही. हा आश्रम संपूर्ण कुटुंबाप्रमाणे चालतो.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकBeedबीड