शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सरपंच परिषदेच्या शिर्डी वारीसाठी ग्रामपंचायतचा स्वनिधी वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:42 IST

येत्या ३१ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असलेल्या राजय्स्तरीय सरपंच परिषदेसाठी सरपंच आणि उपसरपंचांना प्रवास खर्च ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून करावा लागणार आहे.

बीड : येत्या ३१ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असलेल्या राजय्स्तरीय सरपंच परिषदेसाठी सरपंच आणि उपसरपंचांना प्रवास खर्च ग्रामपंचायतींच्या स्वनिधीतून करावा लागणार आहे. या संदर्भात शसनाने निर्देश जारी केले आहेत.शिर्डी येथे ३१ जुलै रोजी होणाऱ्या या सरपंच परिषदेची तयारी जोरात सुरु असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. या सरपंच परिषदेस राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच तसेच ३५१ पंचायत समित्यांचे सभापती आणि जिल्हा परिषदांच्या ३४ अध्यक्षांना आमंत्रित केले आहे.या परिषदेस सरपंच आणि उपसरपंचांना उपस्थित राहता यावे म्हणून त्यांना त्या त्या ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून प्रवास भत्ता मंजूर करण्याबाबत शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. शिर्डी येथे परिषद असल्याने तेथे जाण्यासाठी नेमका प्रवास खर्च किती लागणार याबाबत परिगणना करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे घेण्याबाबत निर्देशित केले आहे.बीड जिल्ह्यात १०२० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ८३२ स्वतंत्र ग्रामपंचायती असून १८८ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. नेमके किती सरपंच, उपसरपंच शिर्डीच्या परिषदेला जाणार याची माहिती घेतली जात असून शासन तरतुदीनुसार ग्रामपंचायतच्या स्वनिधीमधून खर्च करण्याबाबत नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच सरपंच व उपसरपंच परिषदेला गेल्यास जवळपास २४ लाख रुपयांपर्यंत प्रवास भत्ता खर्च होणार आहे. याची तरतूद कशी होते, याकडे लागणार आहे.स्वनिधी जमवताना ग्रामपंचायतींची होतेय कसरतबहुतांश सरपंचांकडे चार चाकी वाहनाची सोय असल्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर बसचे नियोजन मागे पडले. त्यामुळे शिर्डी येथे परिषदेला जाणाºया सरपंच, उपसरपंचांना केलेल्या प्रवास खर्चाचे बिल सादर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रवास भत्ता अदा करण्याची कार्यवाही होते.ग्रामपंचायतींना गाव स्तरावरील विविध करांपोटी होणारे उत्पन्न म्हणजेच स्वनिधी होय. शासनाच्या काही योजनांमध्ये ग्रामपंचायतींना ५ ते १० टक्के स्वनिधीची अट आहे.परंतू अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांकडून करांचा वेळेवर भरणा होत नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांर्यंत आहे. अशा परिस्थितीत स्वनिधीची तरतूद करण्यासाठी ग्रामपंचायतींना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Beedबीडsarpanchसरपंचshirdiशिर्डी